शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सोलापूर जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 12:20 IST

सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत.

ठळक मुद्देशिक्षण विभागाची माहिती८१ नव्या इमारतीचे प्रस्ताव दाखलकमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात या विषयावर चर्चा झाली. बैठकीला शिक्षण सभापती शिवानंद पाटील, सदस्य मायाक्का यमगर, गोविंद जरे, संजय गायकवाड, रणजितसिंह शिंदे, स्वाती कांबळे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक असलेल्या इमारती निर्लेखित करून पाडण्यासाठी दरवर्षी आढावा घेतला जातो. अशा १६४ इमारतींची माहिती यावर्षी पुढे आली आहे. या सर्व शाळांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाºयांकडून तत्काळ पाठविण्यात यावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.येत्या आॅगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यात ज्ञानरचनावाद कार्यक्रम राबविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सहा लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २८२३० रोपे लावण्यात आली़ ही सर्व रोपे जगविण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी वेबसाईट तयार केली जाणार आहे. राज्यस्तरीय खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाºया शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी या वर्षापासून जिल्हा परिषदेकडून पुरस्कार दिले जाणार आहेत़ यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पाच लाख रूपयांची तरतूद केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांच्या दैनिक उपस्थितीच्या नोंदीसाठी बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जावा, यावरही चर्चा करण्यात आली. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये अशा मशिन्स उपलब्ध आहेत. त्यावर शिक्षकांनीही नोंदी कराव्यात यादृष्टीने काय तांत्रिक सुधारणा करता येईल, या संदर्भात माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे ठरले आहे.------------------------------कमी पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजनच्जिल्ह्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३४ आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १८९ शाळा आहेत. या सर्व शाळा एकशिक्षकी असून, विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागते. त्यामुळे गरजेनुसार या शाळा बंद करून येथील शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याच्या दृष्टीने येत्या सात दिवसांत माहिती सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. सांगोला, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट या तालुक्यात अशा शाळांची संख्या अधिक आहे.