शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गळलेल्या गारपीटग्रस्तांसाठी १६ कोटींची मागणी

By admin | Updated: June 12, 2014 00:58 IST

गारपीट अनुदान : तिसऱ्या टप्प्याचे वाटप संथगतीने

सोलापूर: गारपीट नुकसान अनुदानाच्या यादीतून गळलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ कोटी ९४ लाख इतक्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात वाटपासाठी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.१६ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या गारपीटमध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे ३०५ कोटी २७ लाख २९ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम शासनाने तीन टप्प्यात दिली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला ६३ कोटी ६० लाख, दुसऱ्या टप्प्यात १७१ कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ७० कोटी ६६ लाख ५४ हजार रुपये देण्यात आले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांची रक्कम तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. काही रक्कम शेतकऱ्यांची बँक खाती नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून आहे. तिसऱ्या टप्प्याची ७० कोटी ६६ लाख ५४ हजारांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मे रोजी तहसील कार्यालयांना वितरित केली आहे. ही रक्कम काही तहसील कार्यालयांनी बँकांकडे जमा केली आहे. परंतु काही तहसील कार्यालयांनी अद्याप ही रक्कम जमाच केली नाही. तहसील कार्यालयात तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ते किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, अशा पद्धतीने काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. त्यापूर्वी शेतकऱ्यांना याद्याच पहावयाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कोणाचे नाव आहे अन् कोणाचे नाही हे शेतकऱ्यांना समजलेच नाही. नुकसानीच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी नंतर आंदोलन, उपोषण, निवेदने दिली. जिल्हाधिकाऱ्यांना मदतीतून वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या निधीची रक्कम कळविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार सात तहसीलदारांनी १५ कोटी ९४ लाख इतकी मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.---------------------------------------मोहोळने केली १० कोटींची मागणीपंचनामे झाले परंतु मदतीच्या पात्र यादीत नावे आली नसल्याच्या तक्रारी असलेल्यांसाठी १५ कोटी ९४ लाखांची मागणी केली आहे. त्यामध्ये मोहोळ १० कोटी, बार्शी एक कोटी ९६ लाख, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा प्रत्येकी एक कोटी, पंढरपूर एक कोटी ५ लाख, करमाळा ८५ लाख ९७ हजार, सांगोला ८ लाख रुपये. उत्तर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी एक कोटीची मागणी केली असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगितले जात असले तरी त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही.--------------------------------------जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानेनातगारपीट नुकसानीची दुसऱ्या टप्प्याची रक्कम लोकसभा मतदानाअगोदर १५ एप्रिलपूर्वी बँकांना पाठवली होती. त्यानंतर सव्वा महिन्याच्या फरकाने तिसऱ्या टप्प्याची रक्कम आली. ती रक्कम तहसीलदारांकडे देऊन २१ दिवस उलटले आहेत. ३१ मेपर्यंत ही रक्कम वाटप करण्याचे आदेश असताना उत्तर तालुक्यात आजही याद्याच करण्याचे काम सुरू आहे. याच आदेशाला जुमानले जात नसल्याने दुष्काळी निधी कधी जमा होणार, असा प्रश्न किमान उत्तर तालुक्याबाबत तरी सुरू आहे. -----------------------------------