शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

गळलेल्या गारपीटग्रस्तांसाठी १६ कोटींची मागणी

By admin | Updated: June 12, 2014 00:58 IST

गारपीट अनुदान : तिसऱ्या टप्प्याचे वाटप संथगतीने

सोलापूर: गारपीट नुकसान अनुदानाच्या यादीतून गळलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ कोटी ९४ लाख इतक्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात वाटपासाठी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.१६ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या गारपीटमध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे ३०५ कोटी २७ लाख २९ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम शासनाने तीन टप्प्यात दिली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला ६३ कोटी ६० लाख, दुसऱ्या टप्प्यात १७१ कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ७० कोटी ६६ लाख ५४ हजार रुपये देण्यात आले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांची रक्कम तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. काही रक्कम शेतकऱ्यांची बँक खाती नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून आहे. तिसऱ्या टप्प्याची ७० कोटी ६६ लाख ५४ हजारांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मे रोजी तहसील कार्यालयांना वितरित केली आहे. ही रक्कम काही तहसील कार्यालयांनी बँकांकडे जमा केली आहे. परंतु काही तहसील कार्यालयांनी अद्याप ही रक्कम जमाच केली नाही. तहसील कार्यालयात तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ते किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, अशा पद्धतीने काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. त्यापूर्वी शेतकऱ्यांना याद्याच पहावयाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कोणाचे नाव आहे अन् कोणाचे नाही हे शेतकऱ्यांना समजलेच नाही. नुकसानीच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी नंतर आंदोलन, उपोषण, निवेदने दिली. जिल्हाधिकाऱ्यांना मदतीतून वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या निधीची रक्कम कळविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार सात तहसीलदारांनी १५ कोटी ९४ लाख इतकी मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.---------------------------------------मोहोळने केली १० कोटींची मागणीपंचनामे झाले परंतु मदतीच्या पात्र यादीत नावे आली नसल्याच्या तक्रारी असलेल्यांसाठी १५ कोटी ९४ लाखांची मागणी केली आहे. त्यामध्ये मोहोळ १० कोटी, बार्शी एक कोटी ९६ लाख, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा प्रत्येकी एक कोटी, पंढरपूर एक कोटी ५ लाख, करमाळा ८५ लाख ९७ हजार, सांगोला ८ लाख रुपये. उत्तर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी एक कोटीची मागणी केली असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगितले जात असले तरी त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही.--------------------------------------जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानेनातगारपीट नुकसानीची दुसऱ्या टप्प्याची रक्कम लोकसभा मतदानाअगोदर १५ एप्रिलपूर्वी बँकांना पाठवली होती. त्यानंतर सव्वा महिन्याच्या फरकाने तिसऱ्या टप्प्याची रक्कम आली. ती रक्कम तहसीलदारांकडे देऊन २१ दिवस उलटले आहेत. ३१ मेपर्यंत ही रक्कम वाटप करण्याचे आदेश असताना उत्तर तालुक्यात आजही याद्याच करण्याचे काम सुरू आहे. याच आदेशाला जुमानले जात नसल्याने दुष्काळी निधी कधी जमा होणार, असा प्रश्न किमान उत्तर तालुक्याबाबत तरी सुरू आहे. -----------------------------------