शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

राम मंदिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाठविल्या होत्या १२०० शिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:22 IST

प्रत्येक गावात केले होते शिलापूजन; रामज्योती कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन

ठळक मुद्दे३० सप्टेंबर १९८९ मध्ये घटस्थापनेच्या दिवशी शिलापूजन करण्यात आलेशिवस्मारक येथे जिल्ह्यातील सर्व शिला एकत्रित करून त्या रथात ठेवल्याराम मंदिराच्या निर्माणासाठी सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते

सोलापूर : अयोध्या येथे बुधवारी राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे; त्यानंतर बांधकामास सुरुवात होणार आहे; पण मंदिराच्या निर्माणासाठी १९८९ मध्ये जिल्ह्यातून सुमारे १२०० शिला (विटा) पाठविण्यात आल्या होत्या. प्रत्येक गावात शिलापूजन करण्यात आले होते.

राम मंदिराच्या निर्माणासाठी अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विश्व हिंदू परिषदेकडून शिलापूजनाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक गावागावातून शिलापूजन करण्यात आले होते. शहरातील अनेक मंदिरामध्ये शिलापूजन करण्यात आले होते. ३० सप्टेंबर १९८९ मध्ये घटस्थापनेच्या दिवशी शिलापूजन करण्यात आले. शिवस्मारक येथे जिल्ह्यातील सर्व शिला एकत्रित करून त्या रथात ठेवल्या होत्या. त्याच दिवशी हा रथ अयोध्येकडे रवाना झाला. त्यावेळी शहरातून मिरवणूकही काढण्यात आली होती.

राम मंदिराच्या निर्माणासाठी सोलापुरात विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. याचे यशस्वी आयोजन करण्याचे श्रेय हे त्यावेळच्या कार्यकर्त्यांना जाते. यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री कै. बंडेश पांढरे, जिल्हा मंत्री अ‍ॅड. चंद्रकांत मोकाशी, प्रभावती सारोळकर, कै. बापूराव सारोळकर, पुरुषोत्तम उडता, भुजंगराव घुगे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष कै. अरुण वैद्य यांचा सहभाग होता.

मान्यवरांच्या सभेने चैतन्यश्रीरामाचे बंधू भरत यांनी नंदिग्राम येथे वनवासाच्या काळात श्रीरामाच्या पादुकांचे पूजन केले होते. त्या पादुकांच्या (खडावा) अनेक प्रतिकृती तयार करून त्या देशभर पाठविण्यात आल्या होत्या. शहरातील प्रत्येक चौकामध्ये या पादुका पूजनाचा कार्यक्रम २६ सप्टेंबर १९९२ मध्ये झाला. यासोबततच साध्वी शिवा सरस्वती, ऋतंबरा देवीजी, आचार्य धर्मेंद्रजी, विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक अशोक सिंघल हे विविध टप्प्यामध्ये सोलापुरात आले होते. शिवस्मारक, पुंजाल मैदान, बसवंती मंगल कार्यालय येथे त्यांच्या सभा झाल्या होत्या. 

मंदिर निर्माणासाठी रामज्योती कार्यक्रम १८ आॅक्टोबर १९९० रोजी घेण्यात आला होता. अयोध्येवरुन आणलेल्या ज्योतीच्या माध्यमातून सोलापूरकरांनी आपल्या घरासमोर दिवा प्रज्वलित केला होता. शहरातील नागरिकांनी शिलापूजन, रामज्योती कार्यक्रम, पादुका पूजन या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.- उदय वैद्य, सोशल मीडिया प्रमुख, महाराष्ट्र प्रांत, विश्व हिंदू परिषद

टॅग्स :SolapurसोलापूरAyodhyaअयोध्या