शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिका ठरली देवदूत, १६ लाख ९२ हजार रुग्णांना मिळाले जीवदान

By admin | Updated: June 22, 2017 19:53 IST

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर : आप्पासाहेब पाटील

गंभीर स्थितीतील रुग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षात १५ लाख ९२ हजार २०५ जणांचे प्राण वाचविले आहेत़ राज्यात ९३७ रुग्णवाहिकेद्वारे अपघात व इतर रुग्णांना सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सेवेला देवदूत संबोधले जात आहे़ वाढलेल्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रुग्णाला उपचार मिळाल्यास सदर रुग्ण बचावण्याची शक्यता राहते. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे कठीण असते. त्याचबरोबर गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे. या अडचणीच्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी १०८ ही मोफत रुग्णवाहिका सुरू केली़ २०१४ साली ५६ रुग्णवाहिकेद्वारे १७८ अत्यावश्यक रुग्णांसह ३० हजार ७०५ रुग्णांना, २०१५ साली ७२ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २६१ अत्यावश्यक रुग्ण व २५ हजार ५३१ रुग्णांना तर २०१६ मध्ये ७१ रुग्णवाहिकेद्वारे ४९ हजार ३२१ रुग्णांना सेवा दिली़

-----------------------

आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सेवा करणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत १०८ या रूग्णवाहिकेव्दारे ७५ मेडीकल व १० ट्रामा गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला आहे़ पालखी मार्गावरील सर्व रूग्णालयांना रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत़ वारकऱ्यांना छातीत दुखणे, आॅपरेशनस, दंश, दुखापत आदी बाबींसाठी औषधोपचारही सज्ज ठेवण्यात आली आहेत़ ही सेवा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे़ यासाठी पुण्याहुन ५४, साताराहुन ६ तर सोलापूरहुन १६ रूग्णवाहिका पालखी मार्गावर असणार आहेत़

---------------

जिल्हानिहाय रूग्णसंख्येवर एक नजर अहमदनगर ६७१३७, अकोला २७८३०, अमरावती ४९००४, औरंगाबाद ६६९१७, बीड ३८८९६, भंडारा २१०३२, बुलढाणा २१०३२, चंद्रपूर ४४७३१, धुळे ३०११८, गडचिरोली १५९२५, गोंदिया २२६८६, हिंगोली ३२२६७, जळगांव ४९२३०, जालना ३०१८१, कोल्हापूर ६०९२५, लातूर ४१५८०, मुंबई ९४१८१, नागपूर ६२८५६, नांदेड ४९९६६, नंदूरबार २२२६७, नाशिक ८१९०६, उस्मानाबाद ३०५३३, पालघर ३१९५६, परभणी २७१५९, पुणे १४०४५६, रायगड २२९५०, रत्नागिरी २३६५०, सांगली ४३४४५, सातारा ६८०९५, सिंधुदुर्ग १४३५१, सोलापूर १०४४९८, ठाणे ५६६५४, वर्धा १९२०२, वाशिम २३७८९, यवतमाळ ४६३८८़