शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

१०८ रुग्णवाहिका ठरली देवदूत, १६ लाख ९२ हजार रुग्णांना मिळाले जीवदान

By admin | Updated: June 22, 2017 19:53 IST

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर : आप्पासाहेब पाटील

गंभीर स्थितीतील रुग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षात १५ लाख ९२ हजार २०५ जणांचे प्राण वाचविले आहेत़ राज्यात ९३७ रुग्णवाहिकेद्वारे अपघात व इतर रुग्णांना सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सेवेला देवदूत संबोधले जात आहे़ वाढलेल्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रुग्णाला उपचार मिळाल्यास सदर रुग्ण बचावण्याची शक्यता राहते. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे कठीण असते. त्याचबरोबर गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे. या अडचणीच्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी १०८ ही मोफत रुग्णवाहिका सुरू केली़ २०१४ साली ५६ रुग्णवाहिकेद्वारे १७८ अत्यावश्यक रुग्णांसह ३० हजार ७०५ रुग्णांना, २०१५ साली ७२ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २६१ अत्यावश्यक रुग्ण व २५ हजार ५३१ रुग्णांना तर २०१६ मध्ये ७१ रुग्णवाहिकेद्वारे ४९ हजार ३२१ रुग्णांना सेवा दिली़

-----------------------

आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सेवा करणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत १०८ या रूग्णवाहिकेव्दारे ७५ मेडीकल व १० ट्रामा गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला आहे़ पालखी मार्गावरील सर्व रूग्णालयांना रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत़ वारकऱ्यांना छातीत दुखणे, आॅपरेशनस, दंश, दुखापत आदी बाबींसाठी औषधोपचारही सज्ज ठेवण्यात आली आहेत़ ही सेवा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे़ यासाठी पुण्याहुन ५४, साताराहुन ६ तर सोलापूरहुन १६ रूग्णवाहिका पालखी मार्गावर असणार आहेत़

---------------

जिल्हानिहाय रूग्णसंख्येवर एक नजर अहमदनगर ६७१३७, अकोला २७८३०, अमरावती ४९००४, औरंगाबाद ६६९१७, बीड ३८८९६, भंडारा २१०३२, बुलढाणा २१०३२, चंद्रपूर ४४७३१, धुळे ३०११८, गडचिरोली १५९२५, गोंदिया २२६८६, हिंगोली ३२२६७, जळगांव ४९२३०, जालना ३०१८१, कोल्हापूर ६०९२५, लातूर ४१५८०, मुंबई ९४१८१, नागपूर ६२८५६, नांदेड ४९९६६, नंदूरबार २२२६७, नाशिक ८१९०६, उस्मानाबाद ३०५३३, पालघर ३१९५६, परभणी २७१५९, पुणे १४०४५६, रायगड २२९५०, रत्नागिरी २३६५०, सांगली ४३४४५, सातारा ६८०९५, सिंधुदुर्ग १४३५१, सोलापूर १०४४९८, ठाणे ५६६५४, वर्धा १९२०२, वाशिम २३७८९, यवतमाळ ४६३८८़