शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१०८ रुग्णवाहिका ठरली देवदूत, १६ लाख ९२ हजार रुग्णांना मिळाले जीवदान

By admin | Updated: June 22, 2017 19:53 IST

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर : आप्पासाहेब पाटील

गंभीर स्थितीतील रुग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षात १५ लाख ९२ हजार २०५ जणांचे प्राण वाचविले आहेत़ राज्यात ९३७ रुग्णवाहिकेद्वारे अपघात व इतर रुग्णांना सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सेवेला देवदूत संबोधले जात आहे़ वाढलेल्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रुग्णाला उपचार मिळाल्यास सदर रुग्ण बचावण्याची शक्यता राहते. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे कठीण असते. त्याचबरोबर गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे. या अडचणीच्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी १०८ ही मोफत रुग्णवाहिका सुरू केली़ २०१४ साली ५६ रुग्णवाहिकेद्वारे १७८ अत्यावश्यक रुग्णांसह ३० हजार ७०५ रुग्णांना, २०१५ साली ७२ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २६१ अत्यावश्यक रुग्ण व २५ हजार ५३१ रुग्णांना तर २०१६ मध्ये ७१ रुग्णवाहिकेद्वारे ४९ हजार ३२१ रुग्णांना सेवा दिली़

-----------------------

आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सेवा करणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत १०८ या रूग्णवाहिकेव्दारे ७५ मेडीकल व १० ट्रामा गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला आहे़ पालखी मार्गावरील सर्व रूग्णालयांना रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत़ वारकऱ्यांना छातीत दुखणे, आॅपरेशनस, दंश, दुखापत आदी बाबींसाठी औषधोपचारही सज्ज ठेवण्यात आली आहेत़ ही सेवा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे़ यासाठी पुण्याहुन ५४, साताराहुन ६ तर सोलापूरहुन १६ रूग्णवाहिका पालखी मार्गावर असणार आहेत़

---------------

जिल्हानिहाय रूग्णसंख्येवर एक नजर अहमदनगर ६७१३७, अकोला २७८३०, अमरावती ४९००४, औरंगाबाद ६६९१७, बीड ३८८९६, भंडारा २१०३२, बुलढाणा २१०३२, चंद्रपूर ४४७३१, धुळे ३०११८, गडचिरोली १५९२५, गोंदिया २२६८६, हिंगोली ३२२६७, जळगांव ४९२३०, जालना ३०१८१, कोल्हापूर ६०९२५, लातूर ४१५८०, मुंबई ९४१८१, नागपूर ६२८५६, नांदेड ४९९६६, नंदूरबार २२२६७, नाशिक ८१९०६, उस्मानाबाद ३०५३३, पालघर ३१९५६, परभणी २७१५९, पुणे १४०४५६, रायगड २२९५०, रत्नागिरी २३६५०, सांगली ४३४४५, सातारा ६८०९५, सिंधुदुर्ग १४३५१, सोलापूर १०४४९८, ठाणे ५६६५४, वर्धा १९२०२, वाशिम २३७८९, यवतमाळ ४६३८८़