शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

भूक नियंत्रित करणारे अन् पचायला सोपे खजूर सोलापुरातील बाजारपेठेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 3:53 PM

आरोग्यदायी : रमजान महिन्यात वाढली मागणी

सोलापूर : मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र समजल्या जाणारे रमजान महिन्यातील रोजा सुरु झाले आहेत. या काळात इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन उपवास सोडला जातो. कार्बोहायड्रेट्सचे मुबलक प्रमाण असल्याने उपवासाच्या काळात खजुराला विशेष मागणी वाढली आहे. भूक नियंत्रित ठेवण्यास आणि पचनासाठी हे खजूर सोपे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त केले आहे.

खजूरची विक्री तशी वर्षभर होते. मात्र रमजान महिन्याच्या काळात रोजे (उपवास) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या काळात खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध होतात. खजूरचे जवळपास १ हजार प्रकार आहे. त्यापैकी यंदाच्या रमजान काळात ५० हून अधिक प्रकार उपलब्ध झाले आहेत.

सोलापूर शहरामध्ये जवळपास १०० हून अधिक दुकाने आणि हातगाड्यांद्वारे खजूरची विक्री होते. त्यासोबत सुका मेवा ही मिळतो. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठीही डाॅक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. सर्व धर्मीयांमध्ये खजूराला विशेष मागणी आहे. या काळात विविध प्रकारचे खजूर मिळत असल्याने हिंदू बांधवांची ही खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.

-----

दोन हजार रुपयांपासून दर

खजुराचे जवळपास १ हजार प्रकार आहेत. विजापूर वेस येथील मार्केटमध्ये २ हजार रुपये किलोपासून ते ३०० रुपयांपर्यंतची खजूर उपलब्ध आहे. यामध्ये अज्वा (२ हजार रु. किलो), मरियम (६००), कल्सी (७००), अंबर (१५००) मबरुम (१५००) हे सारे किलो, ५०० ग्रॅम, २५० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.

- लूजमध्ये सुलतान (३५० रु. किलो), हारमोनी (३२०), सोलार (३२०), सौदी डेटस् (६००), मदिना (१८००), किमया (३००), इराणी १२०, कपकप (१६०), तनशियन डेट (६००), खुद्री ८००), डेट क्राऊन (२८०),सप्पीट (६४०) असे पन्नासहूवन अधिक प्रकार सोलापुरात मिळू लागल्याचे अब्दुल सत्तार उस्ताद यांनी सांगितले.

----

सौदी, इराणहून येतो माल

- खजूराचे उत्पादन प्रामुख्याने सौदी, अरब, इराण, इराकमध्ये होते. कंटेनरने हा माल मुंबईत येतो. तेथून पँकिंग होते आणि महाराष्ट्रभर त्याचे वितरण केले जाते. ग्राहकांची गरज लक्षात घेता त्याचे २५० ग्रॅमपासून पुढे बॉक्स तयार केले जातात.

- इखलास उस्ताद, व्यापारी

----

खजूर खाण्याचे महत्व

खजूरमध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. विशेष म्हणजे, चवीला चांगली असण्यासोबतच, खजूरात औषधी गुणधर्म आहेत. खजूरमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आहे. दिवसभर आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर पचायला सोप्या असतात त्यामुळे दीर्घकाळ उपवास केल्यावर पोटाचे विकार जडत नाहीत.

--------------

इफ्तारच्या वेळी खजूर खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि उपवास सोडल्यानंतर आपण घाईघाईने जास्त अन्न खाणार नाही, ज्यामुळे पचनाचे विकार आणि भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खजूरमध्ये आढळणारे पोषक घटक ऊर्जेचा स्रोत प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात लोक खजूर खाण्यास प्राधान्य देतात.

- डॉ. अमजद सय्यद

 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारRamadanरमजान