शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

भूक नियंत्रित करणारे अन् पचायला सोपे खजूर सोलापुरातील बाजारपेठेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 15:53 IST

आरोग्यदायी : रमजान महिन्यात वाढली मागणी

सोलापूर : मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र समजल्या जाणारे रमजान महिन्यातील रोजा सुरु झाले आहेत. या काळात इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन उपवास सोडला जातो. कार्बोहायड्रेट्सचे मुबलक प्रमाण असल्याने उपवासाच्या काळात खजुराला विशेष मागणी वाढली आहे. भूक नियंत्रित ठेवण्यास आणि पचनासाठी हे खजूर सोपे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त केले आहे.

खजूरची विक्री तशी वर्षभर होते. मात्र रमजान महिन्याच्या काळात रोजे (उपवास) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या काळात खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध होतात. खजूरचे जवळपास १ हजार प्रकार आहे. त्यापैकी यंदाच्या रमजान काळात ५० हून अधिक प्रकार उपलब्ध झाले आहेत.

सोलापूर शहरामध्ये जवळपास १०० हून अधिक दुकाने आणि हातगाड्यांद्वारे खजूरची विक्री होते. त्यासोबत सुका मेवा ही मिळतो. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठीही डाॅक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. सर्व धर्मीयांमध्ये खजूराला विशेष मागणी आहे. या काळात विविध प्रकारचे खजूर मिळत असल्याने हिंदू बांधवांची ही खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.

-----

दोन हजार रुपयांपासून दर

खजुराचे जवळपास १ हजार प्रकार आहेत. विजापूर वेस येथील मार्केटमध्ये २ हजार रुपये किलोपासून ते ३०० रुपयांपर्यंतची खजूर उपलब्ध आहे. यामध्ये अज्वा (२ हजार रु. किलो), मरियम (६००), कल्सी (७००), अंबर (१५००) मबरुम (१५००) हे सारे किलो, ५०० ग्रॅम, २५० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.

- लूजमध्ये सुलतान (३५० रु. किलो), हारमोनी (३२०), सोलार (३२०), सौदी डेटस् (६००), मदिना (१८००), किमया (३००), इराणी १२०, कपकप (१६०), तनशियन डेट (६००), खुद्री ८००), डेट क्राऊन (२८०),सप्पीट (६४०) असे पन्नासहूवन अधिक प्रकार सोलापुरात मिळू लागल्याचे अब्दुल सत्तार उस्ताद यांनी सांगितले.

----

सौदी, इराणहून येतो माल

- खजूराचे उत्पादन प्रामुख्याने सौदी, अरब, इराण, इराकमध्ये होते. कंटेनरने हा माल मुंबईत येतो. तेथून पँकिंग होते आणि महाराष्ट्रभर त्याचे वितरण केले जाते. ग्राहकांची गरज लक्षात घेता त्याचे २५० ग्रॅमपासून पुढे बॉक्स तयार केले जातात.

- इखलास उस्ताद, व्यापारी

----

खजूर खाण्याचे महत्व

खजूरमध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. विशेष म्हणजे, चवीला चांगली असण्यासोबतच, खजूरात औषधी गुणधर्म आहेत. खजूरमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आहे. दिवसभर आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर पचायला सोप्या असतात त्यामुळे दीर्घकाळ उपवास केल्यावर पोटाचे विकार जडत नाहीत.

--------------

इफ्तारच्या वेळी खजूर खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि उपवास सोडल्यानंतर आपण घाईघाईने जास्त अन्न खाणार नाही, ज्यामुळे पचनाचे विकार आणि भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खजूरमध्ये आढळणारे पोषक घटक ऊर्जेचा स्रोत प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात लोक खजूर खाण्यास प्राधान्य देतात.

- डॉ. अमजद सय्यद

 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारRamadanरमजान