शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भूक नियंत्रित करणारे अन् पचायला सोपे खजूर सोलापुरातील बाजारपेठेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 15:53 IST

आरोग्यदायी : रमजान महिन्यात वाढली मागणी

सोलापूर : मुस्लिम बांधवांमध्ये पवित्र समजल्या जाणारे रमजान महिन्यातील रोजा सुरु झाले आहेत. या काळात इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन उपवास सोडला जातो. कार्बोहायड्रेट्सचे मुबलक प्रमाण असल्याने उपवासाच्या काळात खजुराला विशेष मागणी वाढली आहे. भूक नियंत्रित ठेवण्यास आणि पचनासाठी हे खजूर सोपे असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त केले आहे.

खजूरची विक्री तशी वर्षभर होते. मात्र रमजान महिन्याच्या काळात रोजे (उपवास) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या काळात खजूरचे अनेक प्रकार उपलब्ध होतात. खजूरचे जवळपास १ हजार प्रकार आहे. त्यापैकी यंदाच्या रमजान काळात ५० हून अधिक प्रकार उपलब्ध झाले आहेत.

सोलापूर शहरामध्ये जवळपास १०० हून अधिक दुकाने आणि हातगाड्यांद्वारे खजूरची विक्री होते. त्यासोबत सुका मेवा ही मिळतो. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठीही डाॅक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात. सर्व धर्मीयांमध्ये खजूराला विशेष मागणी आहे. या काळात विविध प्रकारचे खजूर मिळत असल्याने हिंदू बांधवांची ही खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.

-----

दोन हजार रुपयांपासून दर

खजुराचे जवळपास १ हजार प्रकार आहेत. विजापूर वेस येथील मार्केटमध्ये २ हजार रुपये किलोपासून ते ३०० रुपयांपर्यंतची खजूर उपलब्ध आहे. यामध्ये अज्वा (२ हजार रु. किलो), मरियम (६००), कल्सी (७००), अंबर (१५००) मबरुम (१५००) हे सारे किलो, ५०० ग्रॅम, २५० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत.

- लूजमध्ये सुलतान (३५० रु. किलो), हारमोनी (३२०), सोलार (३२०), सौदी डेटस् (६००), मदिना (१८००), किमया (३००), इराणी १२०, कपकप (१६०), तनशियन डेट (६००), खुद्री ८००), डेट क्राऊन (२८०),सप्पीट (६४०) असे पन्नासहूवन अधिक प्रकार सोलापुरात मिळू लागल्याचे अब्दुल सत्तार उस्ताद यांनी सांगितले.

----

सौदी, इराणहून येतो माल

- खजूराचे उत्पादन प्रामुख्याने सौदी, अरब, इराण, इराकमध्ये होते. कंटेनरने हा माल मुंबईत येतो. तेथून पँकिंग होते आणि महाराष्ट्रभर त्याचे वितरण केले जाते. ग्राहकांची गरज लक्षात घेता त्याचे २५० ग्रॅमपासून पुढे बॉक्स तयार केले जातात.

- इखलास उस्ताद, व्यापारी

----

खजूर खाण्याचे महत्व

खजूरमध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. विशेष म्हणजे, चवीला चांगली असण्यासोबतच, खजूरात औषधी गुणधर्म आहेत. खजूरमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आहे. दिवसभर आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. खजूर पचायला सोप्या असतात त्यामुळे दीर्घकाळ उपवास केल्यावर पोटाचे विकार जडत नाहीत.

--------------

इफ्तारच्या वेळी खजूर खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि उपवास सोडल्यानंतर आपण घाईघाईने जास्त अन्न खाणार नाही, ज्यामुळे पचनाचे विकार आणि भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खजूरमध्ये आढळणारे पोषक घटक ऊर्जेचा स्रोत प्रदान करण्यास मदत करतात. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात लोक खजूर खाण्यास प्राधान्य देतात.

- डॉ. अमजद सय्यद

 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारRamadanरमजान