शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरला जाणार का?, युट्यूबरनं विचारला प्रश्न; पाकिस्तानीनं असं उत्तर दिलं, तुम्हीही हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:34 IST

पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानात दिवसेंदिवस वाढणाऱ्या दहशती हल्ल्यामुळे विदारक स्थिती झाली आहे. पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकार त्यांच्या देशातील बिकट परिस्थितीचा सामना करण्याऐवजी लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भडकवण्याचं काम करत आहे. अलीकडेच बलूचिस्तान इथल्या ट्रेन हायजॅक आणि सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर आरोप लावले. पाकिस्तानी सरकारने जनतेच्या मनात भारताबाबत इतकं विष पेरलं ज्यामुळे तिथले जिहादी पुन्हा काश्मीर मुद्द्यावर बोलू लागलेत.

पाकिस्तानी युट्यूबर शोएब चौधरीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर तिथल्या काही लोकांना प्रश्न विचारले, तुम्हाला काश्मीरात जायला आवडेल का त्यावर जमावाने अनेक चिथावणीखोर विधाने केली. एकाने म्हटलं की, इंशाअल्लाह...जरूर जाईन, तिथं जाऊन हिंदू आणि शत्रूंना मारेन. हिंदूंना मारणे मोठे काम आहे. आम्ही इस्लाम धर्मात जन्माला आलोय. जिथं मुसलमानांचा विषय येईल तिथे जीव देऊ, शहीद होऊन जन्नतमध्ये जाऊ असं सांगितले.  त्यांच्या या विधानावरून भारतीयांना हसू आवरेना. 

दुसरीकडे पाकिस्तानातील महागाईवर लोकांना प्रश्न केला. त्यावरून आम्ही गरीब घरातच जन्माला आलोय त्यामुळे या परिस्थितीला करणार तरी काय, आम्ही रडू का, कुणाच्या रडण्यानं महागाई कमी होणारी नाही असं एकाने म्हटलं. तर घरात मुले भुकेले आहेत. याठिकाणी लोक ४-४ दिवसाला जलसाला जाऊन स्वत:ला अपमानित करून घेत आहोत. कुराणचा निर्णय चुकीचा ठरवू नका. अल्लाह ज्याला हवी त्याला इज्जत देईल अथवा जिल्लत देईल असं एका नागरिकाने म्हटलं. 

दरम्यान, स्वत:च्या देशात इतकी वाईट आणि दयनीय अवस्था असतानाही लोकांमधील मस्ती कमी नाही. एकाने असेच काही हास्यास्पद विधान केले. जर मला भारतात घुसण्याची संधी मिळाली तर मी भारताला पूर्ण उद्ध्वस्त करून परतेन. इस्लामविरोधात कुणी काही बोलले तर त्याला सोडणार नाही असं सांगत त्याने पाकिस्तान सरकारवरही नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान