शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काही भारतीय शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का लावलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:10 IST

Knowledge News: सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

Knowledge News: भारतातील शहरं जेवढे विविधतेने नटलेले आहेत, तेवढीच रंजक कहाणी त्यांच्या नावांची सुद्धा आहे. जयपूर, कानपूर, हैद्राबाद, अहमदाबाद या शहरांची नावं तर नक्कीच ऐकली असतील. अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात विचारण्यात आलं की, "भारतातील बऱ्याच शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' का असतं? अर्थातच प्रश्न उत्सुकता वाढवणारा आहे. 

'पूर' शब्दाचा अर्थ?

सोशल मीडियावरील एका व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, 'पूर' हा शब्द संस्कृतमधून आला आहे. ज्याचा अर्थ 'शहर' किंवा 'नगर' होतो. असं सांगितलं जातं की, राजे महाराजे जेव्हा एखादी वस्ती किंवा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांच्या नावासोबत 'पूर' जोडलं जात होतं. उदाहरणार्थ जयपूर (जय सिंह द्वारे वसवण्यात आलं), उदयपूर (उदय सिंह द्वारे) आणि ग्वालियर (ग्वालिपूर) ही नावं हीच परंपरा दर्शवतात. असं सांगण्यात येतं की, 'पूर' कधी कधी 'किल्ला' या संदर्भातही वापरलं जात होतं.

भाषेचे तज्ज्ञ सांगतात की, 'पूर' शब्दाचा प्रयोग वैदिक काळापासून होत आला आहे आणि ऋग्वेदातही याचा उल्लेख आढळतो. उत्तर भारतासोबतच दक्षिण भारतात सुद्धा हा शब्द प्रचलित आहे. जसे की, तिरूपूर आणि काशीपूर.

'बाद' शब्द कुठून आला?

व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, 'बाद' मूळचा फारसीमधून आला आहे आणि तो 'आबाद' पासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो 'वसवण्यात आलेलं ठिकाण' किंवा 'विकसीत वस्ती'. हा शब्द भारतात मुघलांच्या काळात जास्त लोकप्रिय झाला.  त्यावेळी फाससी भाषा प्रशासन आणि संस्कृतीचा भाग बनली होती. हैदराबाद (हैदर अलीच्या नावावर) आणि अहमदाबाद (अहमद शाह द्वारे वसवण्यात आलं). अनेकदा अशा शहरांच्या नावात शेवटी 'बाद' शब्द येतो. कारण ही शहरं पाण्याच्या स्त्रोतांजवळ वसवण्यात आले होते. जे शेती आणि जीवनासाठी आवश्यक आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स