शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Fact Check: लस घेतल्यानंतर दंडात येतो करंट? त्या विजेने बल्बही पेटतो?; जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 10:08 IST

लस घेतलेल्या जागेवर करंट निर्माण होतो त्याने बल्ब पेटतो असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

ठळक मुद्देज्या हाताच्या दंडावर तुम्ही लस घेता त्यामध्ये विजेचा करंट निर्माण होत आहेलस न घेतलेल्या दंडापासून दुसरीकडे बल्बचा टच केल्यानंतर तो पेटत नाही. चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका

मुंबई- कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत सोशल मीडियावर अनेक चुकीच्या आणि बनावट बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. काही लोक कोरोना लसीकरणावरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करतायेत. त्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण होत आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात लसीकरणावरून एक खळबळजनक दावा केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दावा केलाय की, कोविड १९ लसीकरणानंतर(Covid 19 Vaccination) ज्या हाताच्या दंडावर तुम्ही लस घेता त्यामध्ये विजेचा करंट निर्माण होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती दावा करतोय. ज्या दंडावर लस घेतली आहे तिथे विजेचा बल्ब टच केला असता तो पेटतो. तर लस न घेतलेल्या दंडापासून दुसरीकडे बल्बचा टच केल्यानंतर तो पेटत नाही. लस घेतलेल्या जागेवर करंट निर्माण होतो त्याने बल्ब पेटतो असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

PIB फॅक्ट चेकने या व्हिडीओची सत्यता पडताळत सांगितले की, या व्यक्तीने व्हिडीओत जो दावा केला आहे तो पूर्णपणे खोटा आहे. कोविड लसीकरण हे सुरक्षित आहे. अशाप्रकारे बनावट आणि अफवा पसरवू नका. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच कोविड १९ लसीकरणात कोणताही धातू अथवा मायक्रोचिप नाही. किंवा लसीकरणानंतर शरीरात कोणताही चुंबकीय प्रभाव तयार होत नाही ज्याने विजेचा बल्ब पेटेल. त्यामुळे बल्ब पेटवण्याचा दावा चुकीचा आणि निराधार आहे असंही पीआयबीनं स्पष्ट केले आहे.

अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका, कोरोना लसीकरण नक्की करा, कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. प्रत्येकाने लसीकरण करायला हवं असं आवाहन पीआयबीनं लोकांना केले आहे.

कोरोनाच्या संकटात आशेचा किरण!

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रविवारी कोरोनाचे 1 लाख 65 हजार 553 नवे रुग्ण आढळून आले. गेल्या 46 दिवसांतील हा नीचांक आहे. याला बळी पडणारे तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून, रविवारी 3260 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 असून, त्यातील 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 जण बरे झाले. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 लोकांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे. जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या