शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

होणाऱ्या पत्नीलाच घेऊन पळाला; कारण ऐकून पोलिसांसह सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:27 IST

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले.

पटना - होणाऱ्या पत्नीलाच घेऊन तरुण पळून गेल्याची घटना बिहारच्या सारण पानापूरमधून समोर आली आहे. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनाही धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता असे समजते. बराच शोध घेतल्यानंतर अखेर दोघे पोलीस ठाण्यात शरण आले. पोलिसांना त्यांनी पळून जाण्याचे कारण सांगितले ते ऐकून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

राम रुद्रपूर गावात संध्या नावाच्या मुलीचे लग्न अकबरपूर गावातील बोलबम साहनीसोबत निश्चित झाले होते. साखरपुडाही झाला, त्यानंतर दोघांचे फोनवर तासन्- तास बोलणे सुरु झाले. मग एकमेकांशिवाय क्षणभर राहणेही शक्य नाही यावर दोघांचे एकमत झाले, पण लग्न पुढच्या वर्षी होणार होते. त्यामुळे दोघांनी प्लॅन केला आणि ८ नोव्हेंबरला कोणालाही न सांगता पळून गेले.

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले. पुढच्या वर्षी लग्नाची तारीख होती. पण, दोघांनाही लवकर लग्न करायचे होते, तर घरातील लोक उशीर करत होते. त्यामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. हे एकून घरातले लगेच लग्नासाठी तयार झाले. स्थानिक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपम कुमारी यांनी रामजानकी मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न लावून दिले. दोघेही लग्नानंतर खूश आहेत. तर, सोशल मीडियासह परिसरातही प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलीय.