शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

होणाऱ्या पत्नीलाच घेऊन पळाला; कारण ऐकून पोलिसांसह सर्वच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:27 IST

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले.

पटना - होणाऱ्या पत्नीलाच घेऊन तरुण पळून गेल्याची घटना बिहारच्या सारण पानापूरमधून समोर आली आहे. हा प्रकार घरच्यांना समजताच त्यांनाही धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता असे समजते. बराच शोध घेतल्यानंतर अखेर दोघे पोलीस ठाण्यात शरण आले. पोलिसांना त्यांनी पळून जाण्याचे कारण सांगितले ते ऐकून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

राम रुद्रपूर गावात संध्या नावाच्या मुलीचे लग्न अकबरपूर गावातील बोलबम साहनीसोबत निश्चित झाले होते. साखरपुडाही झाला, त्यानंतर दोघांचे फोनवर तासन्- तास बोलणे सुरु झाले. मग एकमेकांशिवाय क्षणभर राहणेही शक्य नाही यावर दोघांचे एकमत झाले, पण लग्न पुढच्या वर्षी होणार होते. त्यामुळे दोघांनी प्लॅन केला आणि ८ नोव्हेंबरला कोणालाही न सांगता पळून गेले.

मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांच्या दबावामुळे दोघे २ डिसेंबरला पानापूरला परतले. पुढच्या वर्षी लग्नाची तारीख होती. पण, दोघांनाही लवकर लग्न करायचे होते, तर घरातील लोक उशीर करत होते. त्यामुळे पळून जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. हे एकून घरातले लगेच लग्नासाठी तयार झाले. स्थानिक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपम कुमारी यांनी रामजानकी मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न लावून दिले. दोघेही लग्नानंतर खूश आहेत. तर, सोशल मीडियासह परिसरातही प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलीय.