शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अरेरे! "पत्नी नाराज होऊन माहेरी गेलीय, मन वळवून परत आणायचंय म्हणून सुट्टी हवी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:32 IST

कानपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने एका उच्च अधिकाऱ्याला पत्र पाठवून आपल्या नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.

पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत असतात. कधीकधी एकाचा राग शांत करण्यासाठी, दुसरा त्याचे मन वळवतो. विशेषत: पतीला पत्नीचा राग शांत करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कित्येकदा बायको रागाच्या भरात तिच्या माहेरच्या घरी जाते, मग नवरा तिची समजूत काढण्यासाठी तिच्या माहेरच्या घरी जातो आणि तिला बरोबर घेऊन येतो. अशा परिस्थितीत नोकरी करणाऱ्यांना, बायकोच्या माहेरी जाण्यासाठी, सुट्टी घेण्यासाठी आधी वरिष्ठांकडे रजेसाठी अर्ज करावा लागत आहे.

एका क्लार्कसोबत अशीच घटना घडली आहे. त्याने लिहिलेला सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कानपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने एका उच्च अधिकाऱ्याला पत्र पाठवून आपल्या नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे. एका क्लार्कने लिहिलेला हा रजेचा अर्ज आता खूप व्हायरल होत आहे.

शमशाद अहमद याने प्रेम नगरच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) यांना पत्र लिहून त्यांना तात्काळ रजेची गरज का आहे हे स्पष्ट केले आहे. अहमदच्या म्हणण्यानुसार, त्याचा त्याच्या पत्नीशी वाद झाला, त्यानंतर ती मुलांना घेऊन तिच्या माहेरच्या घरी गेली. "मी दु:खी आहे. मला पत्नीची समजूत घालण्यासाठी, तिला परत आणण्यासाठी गावी जावे लागेल. कृपया माझ्या रजेचा अर्ज स्वीकारा" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल