शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केली 'अंतिम' इच्छा; एकदम छोटी आहे, मग का आहे एवढी खास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:23 IST

उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अनेकदा रंजक माहिती शेअर करत असतात. कधी ट्रोल होतात, तर अनेकदा फेमसही होतात. आज आनंद महिंद्रांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे. बस एक कप चाय आणि सेल्फी. तुम्ही म्हणाल हे तर ते केव्हाही करू शकतात.

उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अनेकदा रंजक माहिती शेअर करत असतात. कधी ट्रोल होतात, तर अनेकदा फेमसही होतात. कधी कधी ते एखाद्या गरीब परंतू होतकरू लोकांचे एकसो एक जुगाड शेअर करतात, तर कधी साहस केल्याची स्तुती. परंतू आज आनंद महिंद्रांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे. बस एक कप चाय आणि सेल्फी. तुम्ही म्हणाल हे तर ते केव्हाही करू शकतात. परंतू, हा सेल्फी खास आहे, म्हणजेच याचे ठिकाण खास आहे. 

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भारताच्या शेवटच्या दुकानाचा फोटो रिट्विट केला आहे. तसेच हा देशातील सर्वात सुंदर सेल्फी स्पॉटपेक्षा कमी नाहीय, असे म्हटले आहे. या दुकानाचे नाव 'हिंदुस्तान की अंतिम दुकान' असे आहे. त्याचीही त्यांनी स्तुती केली आहे. तसेच या दुकानात एक कप चहा पिने खूप मौल्यवान असेल असेही त्यांनी म्हटले आहे. 

हे दुकान उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. चीनची सीमा अगदी जवळ आहे. माणा गाव हे चीनच्या सीमेवर वसलेले आहे. या गावातील हे चहाचे दुकान आहे. चंदेर सिंह बड़वाल (Chander Singh Badwal) यांचे हे दुकान आहे. २५ वर्षांपूर्वी त्यांनी हे दुकान सुरु केले होते. पर्यटकांमध्ये हे दुकान प्रचंड लोकप्रिय आहे. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती येथील चहा आणि मॅगी खूप पसंद करतो. 

माना गावाचे जुने नाव मणिभद्रपुरम असल्याचे पर्यटक सांगतात. स्थानिक लोक याचा संबंध महाभारताच्या कथेशी जोडतात. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर लोकांनी त्याच्याशी संबंधित किस्से सांगायला सुरुवात केली. या मार्गाने पांडव स्वर्गात गेले असे म्हणतात. माना हे या सीमेवरील शेवटचे भारतीय गाव असल्याचेही गावाजवळील मुख्य रस्त्यावरील फलकावर लिहिलेले आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्रा