शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

जिल्हा परिषद संस्थांना मिळणार तीन हजारांची सुटकेस

By admin | Updated: May 27, 2016 22:28 IST

ग्रामविकास खात्याचा निर्णय : सुटकेससाठी जिल्हापरिषद स्वनिधीतून खर्च करणे बंधनकारक

गिरीष परब--  सिंधुदुर्गगरी --जिल्हा परिषद सदस्यांना त्यांंच्या पाच वर्षाच्या कालावधीत केवळ एकदा तीन हजार रूपयापर्यंतची सूटकेस देण्यात यावी, असे आदेश ग्रामविकास खात्याने काढले आहेत. सूटकेस खरेदीसाठी शासन स्तरावरून निधी मिळणार नसून हा सर्व निधी जिल्हापरिषदेने स्वखर्चातून करणे बंधनकारक असल्याचे या आदेशात राज्याचे सहसचिव नंदकुमार महादेव शिंदे यांनी नमूद केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हापरिषद सदस्यांना चांगल्या प्रतिची सुटकेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी जिल्हापरिषदेचा अर्थसंकल्प (बजेट) मांडला जातो. हा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेची खास सभा बोलावून वित्त व बांधकाम सभापती कडून सादर केला जातो. बजेटच्या सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांना व अधिकाऱ्यांना नवीन डायरी व चांगली सुटकेस किंवा बॅग देण्याची परंपरा अनेक जिल्हा परिषदांनी जोपासली आहे. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. अर्थसंकल्पीय सभेत सदस्य व अधिकाऱ्यांना डायऱ्या किंवा सुटकेस देण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च येतो. जिल्हापरिषद सदस्यांसाठी त्यांच्या पाच वर्षे सदस्यत्वाच्या कालावधीत एकाचवेळी एक बॅग रूपये सातशे पन्नासच्या अधिन राहून खरेदी करण्याबाबत यापूर्वी निर्देश होते. बॅग खरेदी करण्यासाठी रक्कम वाढवावी अशी मागणी राज्यशासनाकडे जिल्हापरिषदांनी व लोकप्रतिनिधी यांच्या कडून करण्यात ैआली होती. त्या अनुषंगाने या बॅग खरेदी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या बॅग खरेदीसाठी किंमतीची मर्यादा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हापरिषदेच्या पन्नास सदस्यांना तीन हजार रूपये किंमतीच्या अधिन राहून पाच वर्षाच्या कालावधीत एकदा सुटकेस मिळणार आहे त्यामुळे एरवी जनतेच्या विविध कामांची कागदपत्रे कॅरीबॅगमध्ये घेऊन फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींची शासनाने काळजी घेतली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचाही उत्साह वाढणार आहे. जिल्हापरिषदेवर दीड लाखाचा पडणार बोजासिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यसंख्या ५० एवढी आहे. जिल्हापरिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक सभागृहात सादर करताना जिल्हापरिषद सदस्य व अधिकाऱ्यांना डायऱ्या दिल्या जात होत्या. सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेने अजूनपर्यंत या सदस्यांना बॅगांचे वाटप कधी केलेले नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे सदस्यांना काहीसा दिलासा मिळाला असून त्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे सुटकेस मिळणार आहे. या सूटकेस खरेदीला दीड लाख रूपये खर्च येणार असून यातील एकही पैसा राज्यशासनाकडून मिळणार नाही. हा सर्व खर्च जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून करणे बंधनकारक असल्याचे राज्याचे उपसचिव नंदकुमार महादेव शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जिल्हापरिषदेवर दीड लाखापर्यंतच्या खर्चाचा बोजा पडणार आहे. शासनाचे आदेश जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाले आहेत.