शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

युवकाची सागरी परिक्रमा--लोकमत विशेष--अभिषेक नार्वेकरकडून विक्रम : ६७८० किलोमीटरचा नऊ राज्यातून सागरी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:21 IST

आंबोली : आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन विक्रम केला आहे.

ठळक मुद्देशेवटचा समुद्रकिनारा पश्चिम बंगाल येथे सायकलने पार केला व मोहीम फत्ते मनाली ते श्रीनगर हा १०६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला

महादेव भिसे ।आंबोली : आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन विक्रम केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग परिक्रमा त्याने सायकलने पार केली. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनारा जवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला.दिव, दमण, पाँडेचेरी, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमधून त्याने प्रवास केला. यावेळी त्याला तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवासामध्ये वादळ, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागला. तरीही न डगमगता अभिषेकने हा टप्पा पार केला.

अभिषेक हा सावंतवाडी येथील आपले शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथील एका पर्यटनाशी निगडित असलेल्या कंपनीमध्ये काम करतो. हे काम करत असताना त्याने यापूर्वीही मनाली ते श्रीनगर हा १०६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक मोहिमा करण्याचे उद्दिष्ट त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. त्यात या सागरी परिक्रमेचा समावेश होता. यापूर्वी अशा प्रकारची कोणीही केली नसल्याने त्याने ही मोहीम करण्याचे ठरवले. व ती बहात्तर दिवसांत पूर्णत्वासही नेली.यात अभिषेकने अथक परिश्रम घेतले व खडतर प्रवासातून ही मोहीम पूर्ण केली. त्याने रोज पस्तीस किलोमीटर सायकल चालवून सरावही केला होता.

७ सप्टेंबरला लखपत गुजरात येथून सुरू करून शंभर किलोमीटर सायकल चालवत त्याने हा टप्पा पार केला. त्याने शेवटचा समुद्रकिनारा पश्चिम बंगाल येथे सायकलने पार केला व मोहीम फत्ते केली. अभिषेकच्या या प्रवासाबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आठवण म्हणून वाळू आणलीखराब रस्ते, खराब हवामान या सर्वांवर मात करत अभिषेकने ही मोहीम यशस्वीरीत्या पार केली. स्वच्छतेचा संदेश देत अभिषेक ज्या ठिकाणी गेला त्या प्रत्येक ठिकाणी अभिषेकचे मनापासून स्वागत करण्यात आले.तर अभिषेकने या मोहिमेची आठवण म्हणून त्याने ९ राज्यातील प्रत्येक समुद्र किनाºयावरील वाळू आठवण म्हणून सोबत आणली.यावेळी अभिषेकने सांगितले की, या पुढील मोहीम ही संपूर्ण युरोप सायकलने फिरण्याची इच्छा आहे. अभिषेकने केलेल्या कामगिरीचे सिंधुदुर्गातून तसेच महाराष्ट्रभरातून कौतुक होत असून सिंधुदुर्गवासीयांनी त्याचे स्वागत करत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.