शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यशश्रीला हवा मायेचा आधार

By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST

आगीने घेतला उर्वरित कुटुंबाचा जीव : तुळस-सिद्धार्थनगर येथील घटना

वेंगुर्ले : आई, बहिणीपाठोपाठ वडिलांनीही कायमचाच निरोप घेतल्याने निराधार झालेली यशश्री मायेच्या माणसांंना पारखी झाली आहे. तिच्या कुटुंबातील कोणीच उरले नसल्याने यशश्रीसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आाहे.वेंगुर्ले तालुक्यातील तुळस-सिद्धार्थनगर येथे गणेश तुळसकर (वय ४0) हे आपली पत्नी द्रौपदी (३५), मुली यशश्री (७) व भाग्यश्री (अडीच वर्षे) याच्यांसोबत राहत होते. गावात मिळेल ते काम करून मोलमजुरीने संसार चालवित होते. शनिवारची रात्र मात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. शनिवारी ( दि. २ एप्रिल) मध्यरात्री गणेश तुळसकर यांच्या घरातील रॉकेलचा दिवा पडून लागलेल्या आगीत गणेश तुळसकर, त्यांची पत्नी द्रौपदी व मुलगी भाग्यश्री गंभीररीत्या भाजले. या कुटुंबातील एकमेव यशश्री आपल्या काकांसमवेत तुळस-मळी येथील कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेल्याने बचावली. या तिघांच्या जाण्याने यशश्री हिचे मातृपितृ छत्र हरपले असून, तिला भगिनीच्या प्रेमालाही मुकावे लागले आहे. निराधार झालेल्या यशश्रीच्या जीवनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या प्राथमिक शाळांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या यशश्रीच्या आयुष्याची सत्वपरीक्षा मात्र त्या आधीच सुरू झाली आहे. आई-वडिलांच्या छत्रछायेला मुकलेल्या व भगिनीच्या प्रेमाला पारखी झालेल्या या यशश्रीला कोण आधार देणार? याची उत्तरे मात्र आज तरी कोणाकडेच नाहीत. (प्रतिनिधी) यशश्रीला आधार देण्यासाठी तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने पुढील दहा वर्षांसाठी तिच्या नावावर दहा हजार रुपयांची कायम ठेव ठेवण्याचा निर्धार तिच्या नातेवाइकांना भेटून व्यक्त केला आहे.