शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जखमी गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडले; भरवस्तीत घुसल्याने उडालेली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 20:17 IST

पुन्हा जंगलाच्या दिशेने रवाना करण्यासाठी म्हणून एक वन रक्षक व एक वनमजुर त्या ठिकाणी २४ तास नेमणूक करण्यात आला आहे.

आंबोली : आंबोली जवळील गेळे गावांमध्ये शनिवारी एक गवा डोळ्याला इजा झाल्याने भर वस्तीमध्ये घुसला होता. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला वनविभाग, वन्यजीव संरक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. तसेच हा गवा पुन्हा वस्तीत येण्याची शक्यता असल्याने त्याला पुन्हा जंगलाच्या दिशेने रवाना करण्यासाठी म्हणून एक वन रक्षक व एक वनमजुर त्या ठिकाणी २४ तास नेमणूक करण्यात आला आहे.

गेळे परिसरात या गव्याला गेल्या चार दिवसापासून येथील स्थानिक पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यांनी पाहिले होते. त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली होती की, त्या गव्याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. याबाबत त्यांनी विविध तज्ञांची बोलून याबाबत काही करता येईल का असे विचारले होते. त्यावेळी हा गवा जंगलामध्ये भरकटत होता. परंतु तो भरकटत भरकटत शनिवारी थेट गावाच्या जवळ पोहोचला.

गेळे गावातील एका घराजवळ असलेल्या शेतामध्ये हा गवा भरकटत होता. याबाबतची माहिती आंबोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्या ठिकाणी आंबोली वनविभागाचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक ए. आर नारनरवर, सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव संरक्षक काका भिसे, तसेच वैद्यकीय अधिकारी सचिन घालवाडकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर व गव्याचे वयोमान पाहता गव्याला कमीत कमी त्रास व्हावा व तो पुन्हा आपल्या अधिवासात पोहोचावा या दृष्टीने विचारविनिमय करून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याला सुरक्षित रित्या जंगलाच्या दिशेने रवाना करण्यात आले., त्यावेळी त्यांना ग्रामस्थांची ही चांगली साथ लाभली. हा गवा पुन्हा गावात येण्याची शक्यता असून जर हा गवा पुन्हा गावाच्या दिशेने आला तर त्याच्यासाठी आवश्यक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली.

नैसर्गिक अधिवासात हुसकावून लावणे हाच पर्याय

गव्याचे वयोमान पाहता गव्याला बेशुद्ध करून मग त्याला पकडून जंगलात नेऊन सोडणे त्याच्या जीवावर बेतले असते. तसेच नैसर्गिक कारणांमुळे वयोमानामुळे सुद्धा बऱ्याचदा काही प्राणी अगदी मरणाच्या उंबरठ्यावर असताना अशा प्रकारे भरकटतात किंवा त्यांना अंधत्व येते. ते वस्तीच्या जवळ येण्याची शक्यता असते. अशावेळी या वन्य प्राण्यांना नैसर्गिकरित्या त्यांच्या अधिवासात सुरक्षित रित्या हुसकावून लावणे हाच एकमेव पर्याय सुरक्षित ठरत असतो.- अनुज खरे, वन्य प्राणी अभ्यासक, पुणे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग