शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

बारा मोठ्या पुलांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण

By admin | Updated: May 24, 2017 18:05 IST

चौपदरीकरण कशेडी-झाराप तिसरा टप्पा

कशेडी-झाराप तिसरा टप्पाआॅनलाईन लोकमतचिपळूण, दि. २४ : मुंबई - गोवा महामार्गाच्या कशेडी ते झाराप या तिसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात येणाऱ्या बाराही मोठ्या पुलांचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जोडरस्त्यांच्या रखडलेल्या भूसंपादनामुळे उर्वरित काम शिल्लक राहिलेले आहे. या कामासाठी येत्या डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची शिफारस राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केली गेली आहे. अडीच वर्षांपूर्वी या पुलाच्या कामाचे आदेश देण्यात आले असून, ही दुसरी मुदतवाढ आहे. महामार्ग चौपदरीकरणातील महत्त्वपूर्ण असलेल्या पुलांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. त्यानुसार खेड तालुक्यातील कशेडी ते सिंधुदुर्गपर्यंत एकूण १४ मोठे पूल असून, राजापूर येथील पूल त्यातून वगळण्यात आला आहे. उर्वरित १३ पुलांमध्ये कोळंबेवगळता जगबुडी, वाशिष्ठी नदीवर दोन, शास्त्री, सप्तलिंगी, आंजणारी, वाकेड, खारेपाटण, जानवली, कसाल, बांबुळ आदी पुलांची कामे सुरु झाली आहेत. यातील बहुतांश पुलांची कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत. नदी प्रवाहातील पुलांच्या स्लॅबसह अन्य कामे प्रगतीपथावर असून, पुलांच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन, त्याबाबतचा जमीन मालकांना मोबदला व त्यानंतरची ताबा पावती झालेली नसल्याने पूल जोडता आलेले नाहीत. सद्यस्थितीत जमीन मालकांना मोबदला वाटपाचे काम सुरु असून, ताबा पावतीची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही पूर्णत्वास जाणार आहे. यामध्ये शास्त्री व कोळंबे पुलाच्या जोडरस्त्याबाबत ताबा पावती झाल्याने तेथील काम सुरु करण्याचे पत्र कंपनीला देण्यात आले आहे. जोडरस्त्यांबरोबर वाळू व खडी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काम करणाऱ्या कंपन्यांनी केली असून, त्यानुसार मुदतवाढीची मागणी केली आहे. या कंपन्यांना सुरुवातीला दिलेली १८ महिन्यांची मुदत डिसेंबर १६मध्ये संपल्यानंतर पुन्हा जून १७पर्यंत पहिली सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या कालावधीतही जोडरस्त्यांचा प्रश्न न सुटल्याने कामासाठी आता पुन्हा डिसेंबरपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे.