शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वर्षभर गुणपत्रकाविना!

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

विद्यापीठाची अनागोंदी : परीक्षेत उत्तीर्ण होऊनही वर्ष वाया

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका डीबीजे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. २०१४मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने त्यांना नोकरीसाठी प्रयत्ना करता आले नाहीत, किंवा इतर ठिकाणी प्रवेशही घेता आला नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट सुरु आहे. मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या ऐश्वर्या पेंडसे व इतर ५३ विद्यार्थ्यांची गुणपत्रके न मिळाल्याने त्यांना इतर ठिकाणी प्रवेश घेता आला नाही किंवा त्यांना नोकरीसाठी प्रयत्नही करता आले नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने महाविद्यालयाकडे संपर्क साधला व चौकशी केली असता आठ दिवस थांबा, असे त्यांना वारंवार सांगितले गेले. परंतु, वर्ष झाले तरीही याप्रकरणी सुधारणा झालेली नाही. अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांचे करिअर दावणीला लागले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने केवळ एकदाच मुंबई विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला आहे. यावरुन महाविद्यालयाच्या प्रशासनाची उदासीनता दिसून येते. कोणतीही ठोस पावले न उचलल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाने या प्रकरणी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तरच या प्रश्नाला वाचा फुटेल. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थीवर्गात नाराजी आहे.विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधल्याने कुलगुरुंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असेल. यात सुधारणा केली जाईल, असे कुलगुरु डॉ. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाविद्यालयाच्या बाजूने जेवढे प्रयत्न करायला हवेत तेवढे आम्ही केले आहेत. अर्थात विद्यापीठ ही यंत्रणा मोठी आहे. जेव्हा आम्ही तेथे पाठपुरावा करतो, संपर्क साधतो, त्यावेळी त्यांच्याकडून संकेत मिळाले. परंतु, गुणपत्रक आले नाही ही वस्तुस्थिती आहे. - डॉ. श्याम जोशी, प्राचार्य, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण