शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

वर्षभर गुणपत्रकाविना!

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

विद्यापीठाची अनागोंदी : परीक्षेत उत्तीर्ण होऊनही वर्ष वाया

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका डीबीजे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. २०१४मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने त्यांना नोकरीसाठी प्रयत्ना करता आले नाहीत, किंवा इतर ठिकाणी प्रवेशही घेता आला नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट सुरु आहे. मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या ऐश्वर्या पेंडसे व इतर ५३ विद्यार्थ्यांची गुणपत्रके न मिळाल्याने त्यांना इतर ठिकाणी प्रवेश घेता आला नाही किंवा त्यांना नोकरीसाठी प्रयत्नही करता आले नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने महाविद्यालयाकडे संपर्क साधला व चौकशी केली असता आठ दिवस थांबा, असे त्यांना वारंवार सांगितले गेले. परंतु, वर्ष झाले तरीही याप्रकरणी सुधारणा झालेली नाही. अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांचे करिअर दावणीला लागले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने केवळ एकदाच मुंबई विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला आहे. यावरुन महाविद्यालयाच्या प्रशासनाची उदासीनता दिसून येते. कोणतीही ठोस पावले न उचलल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाने या प्रकरणी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तरच या प्रश्नाला वाचा फुटेल. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थीवर्गात नाराजी आहे.विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधल्याने कुलगुरुंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असेल. यात सुधारणा केली जाईल, असे कुलगुरु डॉ. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाविद्यालयाच्या बाजूने जेवढे प्रयत्न करायला हवेत तेवढे आम्ही केले आहेत. अर्थात विद्यापीठ ही यंत्रणा मोठी आहे. जेव्हा आम्ही तेथे पाठपुरावा करतो, संपर्क साधतो, त्यावेळी त्यांच्याकडून संकेत मिळाले. परंतु, गुणपत्रक आले नाही ही वस्तुस्थिती आहे. - डॉ. श्याम जोशी, प्राचार्य, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण