शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंचायत राज अभियानातील विजेत्यांचा गौरव

By admin | Updated: March 16, 2015 00:16 IST

जिल्ह्याचा सन्मान : राज्यपालांच्या हस्ते मुंबईत सन्मानपत्र प्रदान

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला होता तर पंचायत समिती सवर्गात राज्यात देवगड पंचायत समितीने दुसरा क्रमांक मिळविला होता तर ग्रामपंचायत स्तरावर राज्यात तृतीय क्रमांक वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीला मिळाला होता. या तिन्ही पुरस्कारांचे वितरण राज्यपाल के. विद्यासागर यांच्या हस्ते मुंबईत झाले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात रविवारी करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात यशवंत पंचायत राज अभियानात तृतीय आल्याने राज्यपाल के. विद्यासागर यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सुनिल रेडकर यांना रोख १० लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविले. राज्यात यशवंत पंचायतराज अभियानात देवगड पंचायत समितीने द्वितीय पारितोषिक पटकाविल्याने राज्यपालांच्या हस्ते रोख रुपये १२ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सभापती मनोज सारंग, गटविकास अधिकारी विजय चव्हाण तसेच राज्यातील या अभियानांतर्गत तृतीय क्रमांक प्राप्त परुळे बाजार ग्रामपंचायतीचा गौरव रोख रुपये १० लाख देऊन केला. या विविध तीन मिळालेल्या पुरस्कारांमुळे राज्यात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला आहे. (प्रतिनिधी)