शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

काजूबोंडूवरील वाइन निर्मिती प्रकल्पाला चालना देणार -पणन मंत्री जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:25 IST

काजू अनुदानातील शेतकरी वंचित राहणार नाहीत

कणकवली : सिंधुदुर्ग बाजार समितीच्या या मार्केट यार्डमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जाईल. पुढील १८ महिन्यांत या इमारतींचे काम पूर्ण करत लोकार्पण होण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल. येथील काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी येथे वाइन निर्मितीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे ३७० कोटी रुपयांच्या काजू वाइन प्रकल्पाला पुढील काळात चालना दिली जाईल. मार्केट यार्डच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींसाठी ५ कोटी ६६ लाख रुपये लागणार असून, त्यापैकी ७५ टक्के रक्कम सिंधुरत्न योजनेमधून देण्यात आली आहे, तर ॲग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधून १ कोटीची रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिंदेसेनेचे उपनेते संजय आग्रे , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते

१५ दिवसांत आंबा महोत्सव घ्यावामंत्री रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आमच्या विभागामार्फत काजूबोंडू प्रकल्प, फळप्रक्रिया योजना, कात प्रकल्प असे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. पणनमार्फत आंबा व मत्स्य वाहतुकीसाठी तरुणांना १० कोल्डस्टोरेज ट्रक देण्यात येणार आहेत. दरवर्षी आंबा महोत्सव आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये भरवतो. त्याच धर्तीवर येत्या १५ दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा महोत्सव घ्यावा, त्यासाठी पणनकडून १ लाख रुपयांची आम्ही मदत करू. कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार नीलेश राणेंच्या मागणीनुसार पॅकिंग हाऊसची योजना करण्यात येईल. येत्या १८ महिन्यांत काम पूर्ण करू आणि मार्केट यार्डचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्र्यांना आमंत्रित करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांच्यावर कडक कारवाई करावीपालकमंत्री नितेश राणे म्हणाले, नारायण राणेंनी जे काही विचार येथे मांडले आहेत, त्यानुसार त्यांचा ७५ व्या वाढदिवस साजरा केला जाईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे ४ लाख झाले पाहिजे. देवगड आणि वेंगुर्लेच्या नावाने बाहेरील राज्यातील आंबे विकले जात आहेत. त्यामुळे कृषी आणि पणन अधिकाऱ्यांना सूचना करतो की, त्याच्यावर कडक कारवाई करावी. निवडणुका संपलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे हेवेदावे, राजकारण न करता जिल्ह्यासाठी जे काय करायचे आहे, ते मी करणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग