शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल 

By सुधीर राणे | Updated: October 7, 2024 15:55 IST

कोकणातील घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज  

कणकवली: मी स्वतंत्र आहे, कोणत्याही पक्षाकडे प्रवेशासाठी गेलेलो नाही. परंतू निलेश राणेंच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या निलेश राणेंना सच्चे शिवसैनिक स्वीकारणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बापानंतर मुलगा किंवा मुलगी आमदार, खासदार होत असल्याची परिस्थिती आहे. तर सिंधुदुर्गात नारायण राणे आपल्या मुलांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक मुलगा भाजपचा आमदार आहे. आता दुसऱ्या मुलाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी त्यांची धडपड आहे. दुसरा मुलगा आमदार व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी घेतली आहे. मात्र, राणे आपल्या कुटुंबासाठी कितीवेळा विविध पक्षांमध्ये जातील? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी किती राहायचे हे लोकांनी ठरवले पाहिजे. काही दिवसांनी सुधीर सावंतांचे वक्तव्य खरे झालेमाजी खासदार सुधीर सावंत यांनी राणे आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले होते. तेव्हा राजापूर न्यायालय परिसरात त्यांच्यावर दगडफेक  झाली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांनी केलेले वक्तव्य खरे झाले.तेलींना तिकीट न मिळण्यासाठी राणेंचे प्रयत्नसिंधुदुर्गातील राणेंचे काही सहकारी ते जिथे जातात तिथे जाऊन आपली पक्ष निष्ठा बाजूला ठेवून कामांचा ठेका मिळवून समाधानी राहतात. मात्र, ज्या सहकाऱ्यांना राजकीय अभिलाषा आहे, त्यांना राणेंनी झाकून ठेवले आहे. २००५ साली राणेंच्या विरोधात मी विधानसभा लढलो. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केले. त्यावेळी आपल्याला कमीपणा येवू नये यासाठी राजन तेली यांना राणेंनी आमदार केले. परंतु आज गरज संपल्यावर राजन तेलींना तिकीट न मिळण्यासाठी राणे प्रयत्न करीत आहेत. 'मतदारांनी विचार करावा'आम्ही २००५ मध्ये राणेंची संगत सोडली. शिवसेनेतील आमचे जुने सहकारी व काही शिवसैनिक त्या पक्षात मी प्रवेश करावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे समाजात काही चर्चा होत आहे. मात्र, मी अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाही. सोबतच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. आता राजकरणात जनतेची लूट करायची आणि टक्केवारीचे राजकारण करायचे, पैशाचा वापर करून निवडणूक जिंकायची असे सुरू आहे. हे आम्हाला  जमणारे नाही. मतांसाठी पैसे घ्यायचे आणि पुढील ५ वर्षे विकास कामे झाली नाही तरी गप्प बसायचे, असे मतदारांना करावे लागेल. त्यामुळे त्याचा त्यांनी जरूर विचार करावा. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणParshuram Upkarपरशुराम उपरकर Nilesh Raneनिलेश राणे