शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील वायफळ पोस्टला चाप हवा

By admin | Updated: July 4, 2015 00:12 IST

तरुणाईने सामाजिक गांभीर्य जपावे : गैरवापर टाळावा; सोशल मीडियातून खूप काही शिकण्यासारखे

सिद्धेश आचरेकर -मालवण -वन्यजीव तंत्रज्ञानातील गतिमान क्रांती म्हणजे व्हॉटस्अ‍ॅप. सोशल मीडियातील एक अग्रेसर अ‍ॅप्स. लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने हाताळता येणारे हे अ‍ॅप्स आता वायफळ गोष्टींना अधिक महत्त्व देत आहे. यात तरुणवर्ग अधिक भरकटत चालला आहे. सोशल मीडिया हे सर्वांपर्यंत पोहोचण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. मात्र, त्याचा गैरवापर होऊन वायफळ पोस्टना अधिक प्राधान्य दिले जात आहे. तरुणांनी सामाजिक बांधीलकी जपत अश्लील अथवा वायफळ पोस्टबाजीला लगाम लावायला हवा. शक्य तेवढा गैरवापर टाळून आधुनिक विचारांच्या देवाण-घेवाणींसाठी वापर होणे गरजेचे आहे. आजच्या युगात सुशिक्षित पिढीकडून जगाला मोठ्या आशा आहेत. मात्र, युवा पिढी चंगळवादाच्या आहारी जात आहे. वायफळ शेरेबाजीला महत्त्व देण्यापेक्षा पुरोगामी विचारांच्या पोस्ट टाका. सेलिब्रेटी अथवा नेत्यांबद्दल भावनिक मजकूर शेअर करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना प्रसिद्धी द्या. सोशल मीडियाचा योग्य वापर तरुणांनी करायचे ठरविले, तर सर्व काही शक्य आहे. सोशल मीडियातून खूप काही शिकण्यासारखे सोशल मीडियामुळे माणसामाणसांतील नात्यात दरी निर्माण होत आहे, अशी ओरड ऐकायला मिळते; पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कितीतरी नाती जोडली गेली आहेत. याला काही अपवाद असतीलही; पण सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाचा वापर करून सर्वांना भुरळ घातली. हे सर्वश्रूतच आहे. एकूणच नातेसंबंध व सामाजिक काम साध्य करण्यासाठी मानवी जीवनात सोशल मीडियातून खूप शिकण्यासारखे असतेही. विचारांची देवाणघेवाण मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अ‍ॅपवर ग्रुप आहे. या ग्रुपवर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, चित्रपट, आदी विषयांवर आठवड्यातून एकदा चर्चा होते. ग्रुपमधील सदस्य सहभागी होऊन विचार व अभिप्राय मांडतात. यात मार्गदर्शकाची भूमिका प्रा. सुमेधा नाईक बजावतात. ‘ही चर्चा अमुची’ हा त्यांचा उपक्रम आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, जर समाजात अशाप्रकारे चर्चात्मक उपक्रम राबविल्यास नक्कीच नवे विचार वृद्धिंगत होऊ शकतात, एवढे मात्र नक्की.वायफळ पोस्टला लगाम हवाच आतापर्यंत विविध अभिनेते, अभिनेत्री तसेच राजकीय व राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल सोशल मीडियातून खिल्ली उडविली जाते. यातून वाद उफाळतो. समाजात तेढ निर्माण होते. आलिया भट, आलोकनाथ, रजनीकांत, श्री-जान्हवी, शरद पवार, आदी सेलिब्रेटींची टेर खेचली जाते. अशांवर कायद्याचे लक्ष असतानासुद्धा त्यांचे विडंबन थांबता थांबत नाही. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री-जान्हवीच्या अश्लील डायलॉगांनी, तर कहरच माजविला आहे.नेत्यांची अवहेलना टाळावीएखादा राष्ट्रीय नेता म्हटला की, सुरुवातीलाच येतो तो त्या नेत्याचा समाज. राष्ट्रीय नेत्यांवरील पोस्ट टाकून आतापर्यंत कितीतरी संघर्षात्मक लढाया झाल्या आहेत, असे समाजात अस्थिरता पसरविणाऱ्यांनी थोर महापुरुषांचे कार्य सर्वांना उलगडून सांगितले पाहिजे. केवळ नेत्यांचे फोटो टाकून कमेंट्स किंवा लाईक मिळविण्यापेक्षा त्यांचे समाजाप्रती असणाऱ्या बहुमूल्य विचारांची देवाण-घेवाण झाल्यास देशाच्या प्रगतीस नक्कीच हातभार लागू शकतो. थोर पुरुषांवर कित्येक पुस्तके आहेत. त्या पुस्तकांतून त्यांच्या विचारांचा संदेश सोशल मीडियातून जगासमोर आणावा.