शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: April 28, 2023 18:50 IST

कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी.

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोंदा खाडीपात्राची अधिकाऱ्यांसमवेत केलेली पाहाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासाठी होती की जमीन खरेदी-विक्रीसाठी होती असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयंत परूळेकर यांनी केला.कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प आणि चांगले प्रकल्प गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मुळातच कोकणचा अभिमान सांगता मग या ठिकाणी चांगले प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा त्यांचे आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प डाॅ.परूळेकर यांनी,  बारसू येथे पेट्रोल केमिकल प्रकल्पाच्या निमित्ताने तेथील ग्रामस्थ व महिलांवर होणाऱ्या दडपशाही बाबत केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बारसू येथे होणारा पेट्रोल केमिकल प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. मात्र सरकारकडून ग्रीन रिफायनरी म्हणून हा प्रकल्प पुढे करत आहेत. या ठिकाणी प्रदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे. रोजगाराचे खोटे गाजरतब्बल प्रतिवर्षी ९ कोटी मेट्रिक टन इतका कच्च्या तेलाचा साठा याठिकाणी येणार आहे. मात्र यातून निर्माण होणारे प्रदूषण हे कोकणासह गोव्याला ही हानिकारक ठरणार आहे. रोजगाराच्या नावाखाली हा प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न होत आहे. मुळात ऑटोमेशनच्या जमान्यात येथे केवळ शिपाई, सुरक्षा रक्षक याच नोकऱ्या शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे रोजगाराचे खोटे गाजर दाखवू नका.विकासाचा प्रकल्प पाहिजे, विषारी वायू नकोकोकणात प्रकल्प आणायला आमचा अजिबात विरोध नाही. या ठिकाणी आलेला वेदांता फाॅक्सकाॅन, टाटा एअरबाॅक्स प्रकल्प कुठे गेला? याचे उत्तर सरकारने द्यावे. आज चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. ते प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू. कोकणी माणसांना विकासाचा प्रकल्प पाहिजे विषारी वायू नको. कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. जनतेला विश्वासात घ्या. त्यांना प्रकल्पाचे फायदे-तोटे समजावून नंतरच प्रकल्प लादा. कारण या देशाला आंदोलनातूनच स्वतंत्र मिळाले आहे. हे सरकारने लक्षात ठेवावे.असेही डाॅ.परुळेकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प