शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: April 28, 2023 18:50 IST

कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी.

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोंदा खाडीपात्राची अधिकाऱ्यांसमवेत केलेली पाहाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासाठी होती की जमीन खरेदी-विक्रीसाठी होती असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयंत परूळेकर यांनी केला.कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प आणि चांगले प्रकल्प गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मुळातच कोकणचा अभिमान सांगता मग या ठिकाणी चांगले प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा त्यांचे आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प डाॅ.परूळेकर यांनी,  बारसू येथे पेट्रोल केमिकल प्रकल्पाच्या निमित्ताने तेथील ग्रामस्थ व महिलांवर होणाऱ्या दडपशाही बाबत केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बारसू येथे होणारा पेट्रोल केमिकल प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. मात्र सरकारकडून ग्रीन रिफायनरी म्हणून हा प्रकल्प पुढे करत आहेत. या ठिकाणी प्रदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे. रोजगाराचे खोटे गाजरतब्बल प्रतिवर्षी ९ कोटी मेट्रिक टन इतका कच्च्या तेलाचा साठा याठिकाणी येणार आहे. मात्र यातून निर्माण होणारे प्रदूषण हे कोकणासह गोव्याला ही हानिकारक ठरणार आहे. रोजगाराच्या नावाखाली हा प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न होत आहे. मुळात ऑटोमेशनच्या जमान्यात येथे केवळ शिपाई, सुरक्षा रक्षक याच नोकऱ्या शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे रोजगाराचे खोटे गाजर दाखवू नका.विकासाचा प्रकल्प पाहिजे, विषारी वायू नकोकोकणात प्रकल्प आणायला आमचा अजिबात विरोध नाही. या ठिकाणी आलेला वेदांता फाॅक्सकाॅन, टाटा एअरबाॅक्स प्रकल्प कुठे गेला? याचे उत्तर सरकारने द्यावे. आज चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. ते प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू. कोकणी माणसांना विकासाचा प्रकल्प पाहिजे विषारी वायू नको. कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. जनतेला विश्वासात घ्या. त्यांना प्रकल्पाचे फायदे-तोटे समजावून नंतरच प्रकल्प लादा. कारण या देशाला आंदोलनातूनच स्वतंत्र मिळाले आहे. हे सरकारने लक्षात ठेवावे.असेही डाॅ.परुळेकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प