शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

घातक ऊर्जानिर्मितीचे उत्तरदायित्त्व कोण घेणार ?

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

रवींद्र वायकर : पालकमंत्री पदावरील नियुक्तीनंतर राजापुरात पहिलाच मेळावा

राजापूर : आपल्याकडे उर्जानिर्मितीचे अनेक उपाय आहे. असे असताना अणुंपासून घातक उर्जा निर्मिती निर्माण करुन त्याचे दायित्त्व कुणी घेणार आहे का? असा सवाल उपस्थित करीत शिवसेना पक्षाने जी भूमिका घेतली तीच पालकमंत्री या नात्याने आपली राहिल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पहिल्या राजापूर दौऱ्यात मांडली.जिल्हा पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर प्रथमच राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. त्यापासून केवळ मासे एवढेच उत्पन्न आपण घेतो. मात्र, त्या समुद्रात आणखी बरेच काही लपले आहे. अन्य देशांनी त्याचा यापूर्वीच शोध घेतला. तशाच प्रकारे आपल्याला देखील ते करायचे आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी भविष्यात समुद्र संशोधनावर भर देणार आहे.उन्हाळी दिवसात ठिकठिकाणी जाणवणारी तीव्र पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाने जलाधिकार योजना सुरु केली असून, त्या माध्यमातून लांजा, राजापूर तालुक्यात ही योजना प्राथमिकतेने राबविणार आहोत व मे महिन्यापूर्वी अनेक ठिकाणी कामे पूर्ण व्हावीत, याची दक्षता आम्ही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथील रखडलेल्या धरणांचा प्रश्न पाच वर्षांत निश्चित मार्गी लावू. त्यादृष्टीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे, असे पुढे बोलताना ते म्हणाले.महामार्गावर घडणारे अपघात व धोकादायक कशेडी घाटासंदर्भात बोलताना, त्यांनी या घाटात बोगदा काढला जाईल, जेणेकरुन पाच मिनीटांत हे अंतर पार करणे सोईचे ठरेल, अशी माहिती दिली.यावेळी त्यांच्यासमवेत मुुंबई विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सेलर नरेशचंद्र यांसह अनेक सेना सदस्य उपस्थित होते. राजापूर तालुक्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर आले होते; त्यामुळे ते जैतापूर प्रकल्पावर ते काय भाष्य करतात त्याची उत्सुकता उपस्थितांना होती. जैतापूरप्रश्नी पक्षाने जी भूमिका घेतली आहे, तीच आपलीही राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आमदार राजन साळवी, गणपत कदम यांनी आपल्या भाषणात राजापुरातील समस्या मांडल्या. जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, पांडुरंग उपळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)