शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

घातक ऊर्जानिर्मितीचे उत्तरदायित्त्व कोण घेणार ?

By admin | Updated: January 29, 2015 00:07 IST

रवींद्र वायकर : पालकमंत्री पदावरील नियुक्तीनंतर राजापुरात पहिलाच मेळावा

राजापूर : आपल्याकडे उर्जानिर्मितीचे अनेक उपाय आहे. असे असताना अणुंपासून घातक उर्जा निर्मिती निर्माण करुन त्याचे दायित्त्व कुणी घेणार आहे का? असा सवाल उपस्थित करीत शिवसेना पक्षाने जी भूमिका घेतली तीच पालकमंत्री या नात्याने आपली राहिल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पहिल्या राजापूर दौऱ्यात मांडली.जिल्हा पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर प्रथमच राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. त्यापासून केवळ मासे एवढेच उत्पन्न आपण घेतो. मात्र, त्या समुद्रात आणखी बरेच काही लपले आहे. अन्य देशांनी त्याचा यापूर्वीच शोध घेतला. तशाच प्रकारे आपल्याला देखील ते करायचे आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी भविष्यात समुद्र संशोधनावर भर देणार आहे.उन्हाळी दिवसात ठिकठिकाणी जाणवणारी तीव्र पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाने जलाधिकार योजना सुरु केली असून, त्या माध्यमातून लांजा, राजापूर तालुक्यात ही योजना प्राथमिकतेने राबविणार आहोत व मे महिन्यापूर्वी अनेक ठिकाणी कामे पूर्ण व्हावीत, याची दक्षता आम्ही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथील रखडलेल्या धरणांचा प्रश्न पाच वर्षांत निश्चित मार्गी लावू. त्यादृष्टीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे, असे पुढे बोलताना ते म्हणाले.महामार्गावर घडणारे अपघात व धोकादायक कशेडी घाटासंदर्भात बोलताना, त्यांनी या घाटात बोगदा काढला जाईल, जेणेकरुन पाच मिनीटांत हे अंतर पार करणे सोईचे ठरेल, अशी माहिती दिली.यावेळी त्यांच्यासमवेत मुुंबई विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सेलर नरेशचंद्र यांसह अनेक सेना सदस्य उपस्थित होते. राजापूर तालुक्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर आले होते; त्यामुळे ते जैतापूर प्रकल्पावर ते काय भाष्य करतात त्याची उत्सुकता उपस्थितांना होती. जैतापूरप्रश्नी पक्षाने जी भूमिका घेतली आहे, तीच आपलीही राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आमदार राजन साळवी, गणपत कदम यांनी आपल्या भाषणात राजापुरातील समस्या मांडल्या. जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, पांडुरंग उपळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)