शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

घरात भांडणे असताना विकासाच्या बाता अशोभनीय

By admin | Updated: October 14, 2015 00:01 IST

नीतेश राणेंचे सेना-भाजपवर टिकास्त्र : दोडामार्गात आघाडीच्या प्रचार कार्यालयाचा प्रारंभ

दोडामार्ग : केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने विकासनिधी आणण्यासाठी मते द्या, असे सांगणाऱ्या सेना-भाजपचे राज्यासह जिल्ह्यात जोरदार भांडण सुरू आहे. ही भांडणे चालू असताना दोडामार्गच्या विकासाची जबाबदारी स्वीकारण्यास सेना-भाजप एकमेकाच्या उरी पडत आहेत. ही खेळी अशोभनीय आहे. मात्र, स्वत:चे घर सांभाळू शकत नाही ते मतदारांना काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित करीत आमदार नीतेश राणे यांनी सेना-भाजपवर टीकास्त्र सोडले. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळीराष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब, तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार नीतेश राणे म्हणाले, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्वाची असून याठिकाणी प्रत्येक प्रभागात मतदार संख्या कमी आहे. यामुळे प्रत्येक मताला महत्त्व आहे. जेवढी ही निवडणूक सोपी वाटते तेवढी सोपी नसून दिवसा कमी आणि रात्री जास्त प्रमाणात निवडणुकीत काम चालणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगली पाहिजे. विरोधकांचे मुद्दे कोणते आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत, यासाठी मतदारांत प्रबोधन करून त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. आज विरोधक असलेले सेना-भाजपवाले प्रचार करताना केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, असे सांगून मते मागत आहेत. हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. परंतु सत्तेच्या गोष्टी जे सांगत आहेत त्यांची भांडणे आज चव्हाट्यावर आली आहेत. सेना-भाजपची युती कोणत्याही क्षणी तुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली असून कल्याण-डोंबिवलीत ही युती तुटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कालच टीका केली. तर आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच ही भांडणे मोठी होणार आहेत. आपला संसार धड नसताना जनतेला भुलवून त्यांचा खोटा विकास करू पाहणाऱ्यांचे मनसुबे जनतेला दाखवून द्या, असे आवाहनही राणे यांनी केले.जिल्ह्याचे पालकमंत्री अकार्यक्षम असल्याने ते नकोत यासाठीच जुने शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. ही इथली खरी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांना आपले घर सांभाळता येत नाही ते जनतेचा विकास कसा करणार हे ओळखणे गरजेचे आहे, अशी टीका आमदार नीतेश राणेंनी केली. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागाची प्रत्येक पदाधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार असून तशी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपला प्रभाग हेच आपले आयुष्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहनही राणेंनी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)गद्दारी खपवून घेणार नाहीकोणत्याही परिस्थितीत गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. जे गद्दारी करतील त्यांचा योग्य समाचार घेतला जाईल, अशी रोखठोक सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना देत याठिकाणी कोणी मी नसून आम्ही आहोत, अशा सूचना त्यांनी दिल्या.चांगले काम करा आपला मोठा विजय होईल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासीत केले.