शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

घरात भांडणे असताना विकासाच्या बाता अशोभनीय

By admin | Updated: October 14, 2015 00:01 IST

नीतेश राणेंचे सेना-भाजपवर टिकास्त्र : दोडामार्गात आघाडीच्या प्रचार कार्यालयाचा प्रारंभ

दोडामार्ग : केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने विकासनिधी आणण्यासाठी मते द्या, असे सांगणाऱ्या सेना-भाजपचे राज्यासह जिल्ह्यात जोरदार भांडण सुरू आहे. ही भांडणे चालू असताना दोडामार्गच्या विकासाची जबाबदारी स्वीकारण्यास सेना-भाजप एकमेकाच्या उरी पडत आहेत. ही खेळी अशोभनीय आहे. मात्र, स्वत:चे घर सांभाळू शकत नाही ते मतदारांना काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित करीत आमदार नीतेश राणे यांनी सेना-भाजपवर टीकास्त्र सोडले. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळीराष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब, तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार नीतेश राणे म्हणाले, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्वाची असून याठिकाणी प्रत्येक प्रभागात मतदार संख्या कमी आहे. यामुळे प्रत्येक मताला महत्त्व आहे. जेवढी ही निवडणूक सोपी वाटते तेवढी सोपी नसून दिवसा कमी आणि रात्री जास्त प्रमाणात निवडणुकीत काम चालणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगली पाहिजे. विरोधकांचे मुद्दे कोणते आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत, यासाठी मतदारांत प्रबोधन करून त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. आज विरोधक असलेले सेना-भाजपवाले प्रचार करताना केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, असे सांगून मते मागत आहेत. हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. परंतु सत्तेच्या गोष्टी जे सांगत आहेत त्यांची भांडणे आज चव्हाट्यावर आली आहेत. सेना-भाजपची युती कोणत्याही क्षणी तुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली असून कल्याण-डोंबिवलीत ही युती तुटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कालच टीका केली. तर आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच ही भांडणे मोठी होणार आहेत. आपला संसार धड नसताना जनतेला भुलवून त्यांचा खोटा विकास करू पाहणाऱ्यांचे मनसुबे जनतेला दाखवून द्या, असे आवाहनही राणे यांनी केले.जिल्ह्याचे पालकमंत्री अकार्यक्षम असल्याने ते नकोत यासाठीच जुने शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. ही इथली खरी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांना आपले घर सांभाळता येत नाही ते जनतेचा विकास कसा करणार हे ओळखणे गरजेचे आहे, अशी टीका आमदार नीतेश राणेंनी केली. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागाची प्रत्येक पदाधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार असून तशी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपला प्रभाग हेच आपले आयुष्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहनही राणेंनी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)गद्दारी खपवून घेणार नाहीकोणत्याही परिस्थितीत गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. जे गद्दारी करतील त्यांचा योग्य समाचार घेतला जाईल, अशी रोखठोक सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना देत याठिकाणी कोणी मी नसून आम्ही आहोत, अशा सूचना त्यांनी दिल्या.चांगले काम करा आपला मोठा विजय होईल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासीत केले.