शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

नीतेश राणेंचा ‘स्वाभिमान’ आता गेला कुठे?--अतुल रावराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:13 IST

वैभववाडी : पक्षाने अन्याय केल्याचे स्पष्ट करीत पक्षसदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देऊन नारायण राणे यांनी स्वाभिमान दाखवून दिला.

ठळक मुद्दे‘तोंड बंद’ करण्याची धमकी मला नको; ‘त्याच’ भाषेत उत्तर देण्याची आपली तयारीकाँग्रेस पक्ष सोडल्याची राणेंनी घोषणा केली. तेव्हा त्यांचा आमदार मुलगा त्यांच्या सोबत नव्हता.

 

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : पक्षाने अन्याय केल्याचे स्पष्ट करीत पक्षसदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देऊन नारायण राणे यांनी स्वाभिमान दाखवून दिला. त्यांच्या बरोबरच सर्व पदाधिका-यांनी राणेंसाठी आपली पदे सोडली. परंतु, राणेंच्या पुण्याईमुळे आमदार झालेले आणि त्यांना देव मानणा-या नीतेश राणेंनी पोटनिवडणुकीच्या भितीने वडीलांना अर्ध्यावर सोडून पळ काढला. मग राज्यात स्वत:ची संघटना चालवणा-या नीतेश राणेंचा 'स्वाभिमान' आता गेला कुठे? असा सवाल करीत धुंदीत कोण असते हे जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही दाखवून दिले आहे. तुम्हाला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर देण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे तोंड बंद करण्याची धमकी मला देऊ नका, असा टोला भाजपचे नेते अतुल रावराणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला.

येथील भाजप संपर्क कार्यालयात रावराणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, बंडू मुंडल्ये, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरचिटणीस किशोर दळवी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली. तेव्हा समर्थकांनी आमदारकीवर लाथ मारुन राणेंना साथ दिली. नंतर त्यातील काहीजण माघारी परतले. परंतु, त्यावेळी समर्थकांनी स्वार्थ न पाहता नेत्याला साथ दिली. मात्र, काँग्रेस पक्ष सोडल्याची राणेंनी घोषणा केली. तेव्हा त्यांचा आमदार मुलगा त्यांच्या सोबत नव्हता. हा त्यांच्या दोन पक्षांतरातील फरक आहे.रावराणे म्हणाले की, अरेरावी आणि दुस-याला तुच्छ लेखण्याची नीतेश राणेंची पध्दत त्यांच्या भवितव्यासाठी अडचण ठरणारी आहे.

मी ६ वर्षांपुर्वी जिल्'ात सक्रिय झालो तो सर्वसामान्य जनतेचे अश्रु पुसण्यासाठी. माझ्यामागे कुणाचाही राजकीय वारसा नाही. समाजकार्य जोड म्हणून मी राजकारणात आलो. त्यामुळे मी कायम जमिनीवरच असतो. पोटनिवडणुकीला घाबरुन त्यांनी वडीलांसोबत आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले नाही, असा आरोप रावराणेंनी केला. नीतेश राणेंचे नाही; पक्षाचे काम करणार!आमदार नीतेश राणे आणि अतुल रावराणे यांच्यात नेहमीच शाब्दिक खटके उडत आले आहेत. त्यामुळे राणे भाजपमध्ये आल्यावर पोटनिवडणुक लागली तर 'त्यांचे' काम करणार की नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता 'आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. नीतेश राणेंचे काम करणार नाही; तर पक्ष जो उमेदवार देईल त्याचे पक्षहितासाठी काम करु, कुणाचेही वैयक्तिक महत्त्व वाढविण्यापेक्षा पक्ष संघटन भक्कम करणे हाच आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे, असे रावराणे यांनी सांगितले.