शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

ठेकेदाराचा कळवळा का ?

By admin | Updated: August 30, 2016 23:53 IST

भालचंद्र साठेंचा जठारांना सवाल : नौटंकीबहाद्दरांची ताकद राज्याने अनुभवलीय

वैभववाडी : आमदार नीतेश राणे यांची ताकद संपूर्ण राज्याला माहित असून त्यांची हिमंत डंपर आंदोलनात सर्वांनी अनुभवली आहे. त्यामुळे प्रमोद जठारांसारख्या नौटंकी बहाद्दरांनी नीतेश राणेंना आव्हान देऊ नये, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना पोपटपंची करण्यात पटाईत असलेल्या जठारांना धरणाच्या ठेकेदाराचा कळवळा का? असा सवाल साठे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.आमदार नीतेश राणे यांनी अरुणा प्रकल्पाचा ठेकेदार ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. त्यामुळे सोमवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, नासीर काझी, युवक तालुकाध्यक्ष हुसेन लांजेकर, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, बाळा हरयाण, स्वप्नील खानविलकर, रितेश सुतार आदी उपस्थित होते.भालचंद्र साठे पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सरकार सोडवायला तयार नसल्याने त्यांनी नीतेश राणेंना बैठक घेण्याची विनंती केली होती. पुनर्वसनाच्या कामाची काहीच प्रगती नसताना धरणाच्या पिचींगचे काम मात्र दोन वर्षे सुरु आहे. त्यामुळेच ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय शासन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही. याची खात्री झाल्यामुळेच आमदार राणे यांनी टाळे ठोकले. परंतु, ठेकेदाराचा जठारांना एवढा कळवळा का यावा. ते आमदार असताना त्यांना ठेकेदाराकडून आर्थिक लाभ होत होता की काय? असे प्रश्न साठे यांनी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, भू-भाडे देताना ठेकेदार सहमतीपत्रावर जमीनदारांच्या सह्या घेत आहे. कालवे किंवा धरणाच्या उत्खननासाठी लागणारी जमीन कंपनीच्या नावावर खरेदी करून ठेकेदार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीत ठेकेदार जबरदस्तीने उत्खनन करीत आहे. तरीही सत्ताधारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार ठेकेदाराची बाजू घेतात याचे आश्चर्य वाटते. आमदार नीतेश राणेंची कृती स्टंटबाजी म्हणता मग पंचायत समिती इमारतीचा विषय ज्या पध्दतीने हाताळला ती जठारांची स्टंटबाजी नव्हती का? त्या ठेकेदाराने प्रमोद जठार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही दिले नाही; म्हणून तो विषय त्यांनी पेटवला काय? असा सवालही भालचंद्र साठे यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)संघर्ष समितीमुळेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रेंगाळलेअरुणा प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर २00७ मध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाची गरज नाही. आमचे प्रश्न आम्हीच सोडवू, अशी भूमिका प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीने घेतली होती. ती भूमिका घेणारे रंगनाथ नागपच होते. संघर्ष समितीची भूमिका नारायण राणे यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रखडले. तेच रंगनाथ नागप आता प्रमोद जठारांच्या मांडीवर बसून बोलत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य प्रश्न रखडण्यास संघर्ष समितीची ती भूमिका आणि पर्यायाने रंगनाथ नागप हेच जबाबदार आहेत, असे भालचंद्र साठे यांनी स्पष्ट केले.धरणावर जठारांच्या मशिनी असल्याचा संशयभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काँग्रेस पक्षाच्या दुकानदारीची काळजी करु नये. त्यांनी स्वत:च्या राजकीय भवितव्याचे बघावे, असा सल्ला बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी दिला आहे. जठार यांनी प्रकल्पग्रस्तांना सोडून ठेकेदाराची बाजू घेतल्यामुळे धरणावर प्रमोद जठारांच्या मशीनरी भाड्याने असल्याचा आम्हाला संशय येतो. त्यामुळेच ठेकेदाराचे काम बंद राहीले तर मशीनरीचे भाडे बुडण्याची भीती वाटत असल्यानेच जठार ठेकेदाराची बाजू घेत असावेत, असा आरोप दिलीप रावराणे यांनी केला आहे.