शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 14:15 IST

शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे.यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात

कणकवली : शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी  नेहमीच हे चित्र पहायला मिळते.

स्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे. मोकाट जनावरांवरील कारवाई  अधूनमधून केली जाते. 

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला शिवशक्ती सभागृहाशेजारी एकच कचराकुंडी आहे. या कचराकुंडीच्या परिसरात जनावरांचा नेहमीच वावर असतो. कचराकुंडी बाजूला करावी किंवा कचराकुंडीचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून जनावरांना कचरा कुंडीतील कचरा बाहेर काढता येणार नाही, अशी मागणी होत आहे. भटके कुत्रे याच परिसरात ठाण मांडून  असतात. त्यांची संख्या कमी झाली असली तरी मोकाट जनावरे मात्र वावरताना दिसतात. 

यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात.  रेल्वे स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वच्छता अभियान राबविताना कणकवली शहरात काही नागरिकांना नगरपंचायतीच्यावतीने घरातील सुका तसेच ओला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबीन वाटण्यात आली आहेत. मात्र, अनेक नागरिकांना डस्टबीन मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना कचरा गोळा करताना अडचण निर्माण होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी अथवा ट्रॅक्टर दिवसातून एकदाच येत असतो. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाºया नागरिकांना या गाड्या गेल्यानंतर आपल्याजवळील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न सतावत आहे.

शहरात कचºयाची समस्या

कणकवली शहरातील कचºयाची समस्या सुटलेली नाही. जागोजागी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे  ठिकठिकाणी पहायला मिळतात. नगरपंचायतीने योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलेले नाही. दिवसभरातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे साचलेला कचरा फेकून देण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते. 

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग