शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 14:15 IST

शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे.यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात

कणकवली : शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी  नेहमीच हे चित्र पहायला मिळते.

स्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे. मोकाट जनावरांवरील कारवाई  अधूनमधून केली जाते. 

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला शिवशक्ती सभागृहाशेजारी एकच कचराकुंडी आहे. या कचराकुंडीच्या परिसरात जनावरांचा नेहमीच वावर असतो. कचराकुंडी बाजूला करावी किंवा कचराकुंडीचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून जनावरांना कचरा कुंडीतील कचरा बाहेर काढता येणार नाही, अशी मागणी होत आहे. भटके कुत्रे याच परिसरात ठाण मांडून  असतात. त्यांची संख्या कमी झाली असली तरी मोकाट जनावरे मात्र वावरताना दिसतात. 

यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात.  रेल्वे स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वच्छता अभियान राबविताना कणकवली शहरात काही नागरिकांना नगरपंचायतीच्यावतीने घरातील सुका तसेच ओला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबीन वाटण्यात आली आहेत. मात्र, अनेक नागरिकांना डस्टबीन मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना कचरा गोळा करताना अडचण निर्माण होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी अथवा ट्रॅक्टर दिवसातून एकदाच येत असतो. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाºया नागरिकांना या गाड्या गेल्यानंतर आपल्याजवळील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न सतावत आहे.

शहरात कचºयाची समस्या

कणकवली शहरातील कचºयाची समस्या सुटलेली नाही. जागोजागी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे  ठिकठिकाणी पहायला मिळतात. नगरपंचायतीने योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलेले नाही. दिवसभरातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे साचलेला कचरा फेकून देण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते. 

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग