शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 14:15 IST

शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे.यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात

कणकवली : शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी  नेहमीच हे चित्र पहायला मिळते.

स्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे. मोकाट जनावरांवरील कारवाई  अधूनमधून केली जाते. 

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला शिवशक्ती सभागृहाशेजारी एकच कचराकुंडी आहे. या कचराकुंडीच्या परिसरात जनावरांचा नेहमीच वावर असतो. कचराकुंडी बाजूला करावी किंवा कचराकुंडीचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून जनावरांना कचरा कुंडीतील कचरा बाहेर काढता येणार नाही, अशी मागणी होत आहे. भटके कुत्रे याच परिसरात ठाण मांडून  असतात. त्यांची संख्या कमी झाली असली तरी मोकाट जनावरे मात्र वावरताना दिसतात. 

यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात.  रेल्वे स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वच्छता अभियान राबविताना कणकवली शहरात काही नागरिकांना नगरपंचायतीच्यावतीने घरातील सुका तसेच ओला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबीन वाटण्यात आली आहेत. मात्र, अनेक नागरिकांना डस्टबीन मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना कचरा गोळा करताना अडचण निर्माण होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी अथवा ट्रॅक्टर दिवसातून एकदाच येत असतो. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाºया नागरिकांना या गाड्या गेल्यानंतर आपल्याजवळील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न सतावत आहे.

शहरात कचºयाची समस्या

कणकवली शहरातील कचºयाची समस्या सुटलेली नाही. जागोजागी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे  ठिकठिकाणी पहायला मिळतात. नगरपंचायतीने योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलेले नाही. दिवसभरातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे साचलेला कचरा फेकून देण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते. 

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग