शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

पर्यटक व नागरिकांच्या स्वागताला कणकवलीच्या रस्त्यावरच मोकाट जनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 14:15 IST

शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे.यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात

कणकवली : शहरातील कचराकुंड्या योग्य पद्धतीने ठेवण्यात न आल्याने यातील कचरा जागोजागी पसरत आहे. त्यामुळे मोकाट जनावरे अशा कचराकुंड्यांमध्ये टाकल्या जाणाºया टाकाऊ पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी  नेहमीच हे चित्र पहायला मिळते.

स्वच्छ आणि सुंदर कणकवलीच्या नावाखाली खर्च झाला असतानाही प्रशासन मात्र  सुशेगाद असल्याचे पहावयास मिळत  आहे. मोकाट जनावरांवरील कारवाई  अधूनमधून केली जाते. 

रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला शिवशक्ती सभागृहाशेजारी एकच कचराकुंडी आहे. या कचराकुंडीच्या परिसरात जनावरांचा नेहमीच वावर असतो. कचराकुंडी बाजूला करावी किंवा कचराकुंडीचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून जनावरांना कचरा कुंडीतील कचरा बाहेर काढता येणार नाही, अशी मागणी होत आहे. भटके कुत्रे याच परिसरात ठाण मांडून  असतात. त्यांची संख्या कमी झाली असली तरी मोकाट जनावरे मात्र वावरताना दिसतात. 

यावर नगरपंचायत प्रशासन कारवाई करीत  नसल्याने शेतकरी आपल्या जनावरांना सोडून देतात.  रेल्वे स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्वच्छता अभियान राबविताना कणकवली शहरात काही नागरिकांना नगरपंचायतीच्यावतीने घरातील सुका तसेच ओला कचरा गोळा करण्यासाठी डस्टबीन वाटण्यात आली आहेत. मात्र, अनेक नागरिकांना डस्टबीन मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना कचरा गोळा करताना अडचण निर्माण होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी अथवा ट्रॅक्टर दिवसातून एकदाच येत असतो. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाºया नागरिकांना या गाड्या गेल्यानंतर आपल्याजवळील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न सतावत आहे.

शहरात कचºयाची समस्या

कणकवली शहरातील कचºयाची समस्या सुटलेली नाही. जागोजागी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे  ठिकठिकाणी पहायला मिळतात. नगरपंचायतीने योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलेले नाही. दिवसभरातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे साचलेला कचरा फेकून देण्यासाठी नागरिकांची गैरसोय होते. 

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग