शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील दहशतीचे समूळ उच्चाटन करू

By admin | Updated: July 11, 2016 00:03 IST

दीपक केसरकर : कायदा, सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध

सावंतवाडी : जिल्ह्याला प्रथमच मिळालेले गृहराज्यमंंत्री पद हे कोकणच्या विकासाचे नवे द्योतक असून, भयमुक्त आणि संस्कारशील कोकण निर्माण करण्यासाठी येथील राजकीय दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी आपण पूर्ण क्षमतेने पेलू. तसेच राज्यातील पोलिस दलाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच विशिष्ट काळात दहशत घालणाऱ्यांना कायमचा धडा शिकवून राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यास आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व नव्याने मिळालेल्या गृह खात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. गृहखात्याचा कारभार मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेत नवीन खात्याच्या कारभाराबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शब्बीर मणियार, राकेश नेवगी, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, संस्कारशील कोकणातील सर्वसामान्य जनतेने अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जी वृत्ती दाखविली, त्यातूनच आपल्या कारभाराची सुरुवात झाली. आपणास राज्याचे नेतृत्व करण्याची मिळालेली संधीही त्याचाच भाग असून, उद्धव ठाकरे यांच्या कोकणावरील प्रेमामुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू विश्वासामुळेच हे पद आपणास मिळाले आहे. अलीकडील काही काळात कोकणाचे बदनाम झालेले नाव पुन्हा उजळण्याची ही संधी असून, त्याचे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सोने केले जाईल. राजकीय निवडणुकीदरम्यान काही विशिष्ट मंडळींकडून राडे घातले जातात, त्यांनाही आवर घालत भानावर आणून कोकणातील सर्वसामान्यांना भयमुक्त जगणे निर्माण करण्याची आपली विशेष मोहीम असेल. त्यामुळे अशा मंडळींनी याची दखल घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिस दलाच्या प्रलंबित अडचणींसह पोलिसांच्या सद्य:स्थितीतील राहत्या घरांची पाहणी करून त्यांची तात्पुरती आणि तत्काळ डागडुजी करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधा व पोलिसांसाठी आवश्यक साधनसामग्री पुरवून, पोलिस दल अधिक सजग करण्यावर आपला भर राहील. (वार्ताहर) ही धमकी नव्हे... अलीकडील काही वर्षांत दहशतीने जिल्ह्याचे नाव बदनाम झाले होते. कोकणचा समृद्ध व संस्कारशीलतेचा वारसा असा सहजासहजी मिटणारा नाही. अशा प्रवृत्तींना वेसन घालून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल आणि ही धमकी न समजता कोकणच्या खऱ्या संस्कृतीची प्रचिती असल्याचे ठामपणे केसरकर यांनी सांगितले. आरोप करणाऱ्यांचे काळे धंदे ४विरोधकांकडून अवैध धंद्यांच्या होणाऱ्या आरोपाला केसरकर यांनी आक्रमक होत, अवैध धंदे असणारेच जिल्ह्याचे व शहराचे नाव बदनाम करीत आहेत. ४त्यांनी वेळीच आपल्या जिभेला मर्यादा घालावी, अन्यथा बापूसाहेब महाराजांचा वारसा असणाऱ्या संस्कारी नगरीला गालबोट न लागण्याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सांगितले.