शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

निधी नसल्याने पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 11, 2017 21:16 IST

राष्ट्रीय पेयजल योजना : १६७ कामे अपूर्ण

शोभना कांबळे-- रत्नागिरी --चालू आथिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यासाठीचा २० कोटींचा निधी केंद्राकडून न आल्याने राज्याचा १६.२० कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्याचा निधी येऊनही तो खर्च करण्यासंदर्भात कुठलेच मार्गदर्शन न मिळाल्याने या योजनेची जिल्ह््यातील १६७ कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे आता राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. काही योजना या केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. त्यात काही टक्के निधी राज्य सरकारकडून जोडला जातो. राष्ट्रीय पेयजल योजनेसाठीही केंद्र सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी २० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्याला जोड निधी म्हणून राज्य सरकारकडून १६.२० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. राज्याचा हा निधी जिल्हा प्रशासनाकडे याआधीच आला आहे. मात्र, केंद्राकडून अद्यापही निधी आलेला नाही. हा निधी न आल्याने राज्याचा निधी खर्च करण्याकरिताही कुठलेच मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाही. आता आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना सुरू झाला तरी केंद्राचा वाटा अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे आलेला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेची अनेक कामे ठप्प झाली आहेत. राज्याचा १६.२० कोटींचा निधीही तसाच पडून आहे.राज्य शासनाकडून या योजनांसाठी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, त्यातील केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध झालेला नाही. या योजना कशा राबवाव्यात किंवा आहे तो निधी कसा वापरावा, याबाबत मार्गदर्शनही न आल्याने योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची कुचंबणा झाली आहे. निधीअभावी राष्ट्रीय पेयजल योजना अडकून पडल्या आहेत. गतवर्षीच्या शिल्लक निधीतून थोडीफार कामे झाली. पण आता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय, हा प्रश्नच आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांसाठी केंद्राकडून यावर्षीसाठी अद्याप निधीच आलेला नाही. त्यामुळे राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार आहे. यामुळे जिल्ह््यातील १६७ कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामुळे या निधीचा विनीयोग करण्याची परवानगी मिळावी, असे साकडे आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे घातले आहे. आता यावर शासनाच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)चित्र बदलले : निधी मिळण्यास विलंब नाहीकेंद्र आणि राज्याच्या संयुक्त योजना वर्षानुवर्षे राबवल्या जात आहेत. केंद्राकडून त्यांचा वाटा उपलब्ध होतो. मात्र, राज्य सरकारकडून अपेक्षित असलेला निधी मिळण्यास विलंब होतो, अशी स्थिती यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. यावेळी मात्र हे चित्र बदलले आहे. राज्य सरकारचा वाटा असलेली रक्कम उपलब्ध झाली असली, तरी केंद्र शासनाकडून अजूनही निधी मिळालेला नाही.राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी; जिल्हा प्रशासनाची राज्य शासनाकडे मागणी.राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार.केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध नाही.आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय?नवीन प्रश्न उभा.होळीचा होम पेटला... : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील श्रीदेवी तळेकरीणचा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवानिमित्त होम पेटविण्यात आला. या होमात नारळ अर्पण करण्यासाठी नवदाम्पत्यांची गर्दी झाली होती.