शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसल्याने पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 11, 2017 21:16 IST

राष्ट्रीय पेयजल योजना : १६७ कामे अपूर्ण

शोभना कांबळे-- रत्नागिरी --चालू आथिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यासाठीचा २० कोटींचा निधी केंद्राकडून न आल्याने राज्याचा १६.२० कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्याचा निधी येऊनही तो खर्च करण्यासंदर्भात कुठलेच मार्गदर्शन न मिळाल्याने या योजनेची जिल्ह््यातील १६७ कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे आता राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. काही योजना या केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. त्यात काही टक्के निधी राज्य सरकारकडून जोडला जातो. राष्ट्रीय पेयजल योजनेसाठीही केंद्र सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी २० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्याला जोड निधी म्हणून राज्य सरकारकडून १६.२० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. राज्याचा हा निधी जिल्हा प्रशासनाकडे याआधीच आला आहे. मात्र, केंद्राकडून अद्यापही निधी आलेला नाही. हा निधी न आल्याने राज्याचा निधी खर्च करण्याकरिताही कुठलेच मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाही. आता आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना सुरू झाला तरी केंद्राचा वाटा अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे आलेला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेची अनेक कामे ठप्प झाली आहेत. राज्याचा १६.२० कोटींचा निधीही तसाच पडून आहे.राज्य शासनाकडून या योजनांसाठी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, त्यातील केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध झालेला नाही. या योजना कशा राबवाव्यात किंवा आहे तो निधी कसा वापरावा, याबाबत मार्गदर्शनही न आल्याने योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची कुचंबणा झाली आहे. निधीअभावी राष्ट्रीय पेयजल योजना अडकून पडल्या आहेत. गतवर्षीच्या शिल्लक निधीतून थोडीफार कामे झाली. पण आता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय, हा प्रश्नच आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांसाठी केंद्राकडून यावर्षीसाठी अद्याप निधीच आलेला नाही. त्यामुळे राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार आहे. यामुळे जिल्ह््यातील १६७ कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामुळे या निधीचा विनीयोग करण्याची परवानगी मिळावी, असे साकडे आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे घातले आहे. आता यावर शासनाच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)चित्र बदलले : निधी मिळण्यास विलंब नाहीकेंद्र आणि राज्याच्या संयुक्त योजना वर्षानुवर्षे राबवल्या जात आहेत. केंद्राकडून त्यांचा वाटा उपलब्ध होतो. मात्र, राज्य सरकारकडून अपेक्षित असलेला निधी मिळण्यास विलंब होतो, अशी स्थिती यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. यावेळी मात्र हे चित्र बदलले आहे. राज्य सरकारचा वाटा असलेली रक्कम उपलब्ध झाली असली, तरी केंद्र शासनाकडून अजूनही निधी मिळालेला नाही.राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी; जिल्हा प्रशासनाची राज्य शासनाकडे मागणी.राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार.केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध नाही.आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय?नवीन प्रश्न उभा.होळीचा होम पेटला... : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील श्रीदेवी तळेकरीणचा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवानिमित्त होम पेटविण्यात आला. या होमात नारळ अर्पण करण्यासाठी नवदाम्पत्यांची गर्दी झाली होती.