शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाणी तुंबल्याने खारेपाटण येथील आवेरा पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:29 IST

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथील आवेराचा पूल येथे सध्या महामार्ग प्राधिकरणच्यावतीने मोठ्या प्रमाणात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ...

ठळक मुद्देपाणी तुंबल्याने खारेपाटण येथील आवेरा पुलाला धोकासंरक्षक भिंत, पिलरचे काम अर्धवट स्थितीत

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथील आवेराचा पूल येथे सध्या महामार्ग प्राधिकरणच्यावतीने मोठ्या प्रमाणात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या पुलाच्या शेजारी नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत व पिलरचे काम अर्धवट स्थितीत आहे.हे काम करीत असताना उत्खनन केलेली माती व दगड जुन्या आवेराच्या पुलाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या पाणी जाण्याच्या मार्गावर टाकल्याने पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलालासुद्धा धोका निर्माण झाला आहे.खारेपाटण येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. खारेपाटण आवेराचा पूल येथील भागात मोठ्या प्रमाणात कातळ म्हणजेच काळा दगड सापडल्यामुळे महामार्ग ठेकेदाराने आपला बराच वेळ येथे मिळालेला खनिजसाठा उत्खनन करण्यात घालविला. जेवढा काळा दगड मिळेल, तेवढी खोदाई करण्याचा जणू सपाटाच चालविला होता.परिणामी शनिवारी येथे खोलगट भाग तयार झाला असून, काही ठिकाणी महामार्गाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर सध्या असलेल्या महामार्गाच्या उंचीपेक्षा बऱ्यांचअंशी कमी उंचीने आताच्या महामार्गाचे काम खाली उतरविण्यात आले आहे. या पुलावर आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत व होतदेखील आहेत. मात्र, सध्या जे येथे महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने काम सुरू आहे, त्याचा फटका येथील जुन्या असलेल्या आवेराच्या पुलाला बसण्याची दाट शक्यता आहे.ठेकदाराने नवीन आवेराच्या पुलाचे बांधकाम करीत असताना पिलर खोदाई करून काढलेली माती व दगड हे बाजूला न काढता जुन्या आवेराच्या पुलाच्या खालील भागातच रचून ठेवल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी तेथे तुंबले आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होऊन सर्वत्र पाणी तुडुंब भरले असल्याने या मार्गावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे.पाण्याचा मार्ग मोकळा करावाखारेपाटण आवेराचा पूल येथे पाणी तुडुंब भरून राहिले आहे. मुसळधार पाऊस असाच कायम राहिल्यास आवेराच्या पुलाच्या वरच्या बाजूला साठलेले पाणी कधी आवेराच्या पुलाच्या वर येईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद व्हायला वेळ लागणार नाही. संबंधित महामार्ग ठेकेदाराने याकडे त्वरित लक्ष देऊन बंद झालेल्या पाण्याचा मार्गमोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग