शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

जलयुक्त शिवारचा सिंधुदुर्गातील ५८ गावांना फायदा, ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:34 IST

पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत होणार

सिंधुदुर्गनगरी : पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला असून या गावांमध्ये एकूण ३३३०.७३ टीसीएम एवढ्या पाणी साठवण क्षमतेची निर्मिती झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र - २०१९ अंतर्गत २०१५-१६ पासून महाराष्ट्र शासन ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण ही महत्त्वाकांशी योजना राबवित आहे. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणलोट प्रकल्प पूर्ण झालेल्या तसेच पाणीटंचाई जाणवणाºया गावांची निवड या अभियानात करून ती गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यासाठी गावातील नागरिकांच्या सहकार्याने करावयाच्या उपाययोजनांचे आराखडे बनविले जातात. तर गावात शिवार फेरी काढून याबाबत जनजागृती केली जाते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या पाच वर्षात जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे.

२०१५-१६ या पहिल्या वर्षी ३५ गावांची निवड प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली होती. या गावांत पाणी साठा सुरक्षित करणारी ४९४ कामे करण्यात आली होती. १७ कोटी ३९ लाख २८ हजार रुपये एवढा निधी यासाठी खर्च करण्यात आला. ही सर्व कामे पूर्ण झाली असून यामुळे २६०७.३० टीसीएम एवढी पाणी साठवण क्षमतेची निर्मिती होऊ शकली आहे. ९३५.८१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. परिणामी दुबार पिकाखाली व फळझाड लागवडीखाली क्षेत्र या गावातील वाढले आहे.

२०१६-१७ मध्ये २३ गावांची जलयुक्तमध्ये निवड करण्यात आली. २७२ कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील २६९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. २३८ कामे सुरु झाली असून २०६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांवर पाच कोटी ९१ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

या पूर्ण झालेल्या कामामुळे ७२३.४३ टीसीएम एवढी पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. ११३४.७३ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येऊ शकले. परिणामी दुबार पिकाखालील क्षेत्र ६४० हेक्टरने वाढू शकले. तर फळबाग लागवडीखालील क्षेत्रातही ५०० हेक्टरने वाढ झाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे पूर्ण झाल्यावर या जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात होणाºया संभाव्य पाणीटंचाईवर काही अंशी मात करणे प्रशासनाला सोपे जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ गावेजलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात हडपीड, वाघिवरे, शिरवली, कोटकामते, कुवळे, नाधवडे, हरकुळ खुर्द, करंजे, कोळोशी, ओझरम, नागसावंतवाडी, कुणकवळे, चुनवरे, चिंदर, कर्लाचा व्हाळ, तुळसुली तर्फ माणगाव, हिर्लोक, आंदुर्ले, शिवापूर, भडगाव, गोठोस, आवळेगाव, कोचरा, आरवली, सोनुर्ली, केसरी, भालावल बावळाट, निरवडे, तांबोळी, तळकट, फुकेरी, पालये, कुंभवडे, कोंडये.

दुसऱ्या टप्प्यात २३ गावांचा समावेशजलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वळीवंडे, शेवरे, उंबर्डे, तिरवडे तर्फ खारेपाटण, वारगाव, कसवण-तळवडे, धारेश्वर-कासार्डे, वायंगणी, वराड, पोईप, मसुरे, किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारूर, साळगाव, रावदस-कुसेवाडा, पेंडुर, मळगाव, गेळे, नेमळे, माजगाव, माटणे, वझरे या जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सन ३0१६-१७ या आर्थिक वर्षात कामे करण्यात आली आहेत.

मानस पूर्णत्वास जाईल२०१७-१८ या वर्षासाठी ३७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. पाणलोटची ८०० कामे प्रस्तावित करून १४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

या आराखड्यानुसार कामे पूर्ण झाल्यास संरक्षित, फळबाग लागवड, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ होणार असून जिल्ह्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानचा पाणी टंचाईमुक्त गावे हा मानस पूर्णत्वाकडे जाताना या जिल्ह्यात दिसत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग