शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मालवणात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 10, 2015 23:52 IST

ग्रामस्थांची पायपीट : आढावा बैठकीत ७२ लाखांचे नियोजन

मालवण : पावसाळा सुरु होण्यास अद्याप दीड-दोन महिने असताना एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच मालवण तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. एक कळशी पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. असे असतानाही मालवण तालुक्याच्या प्रशासनाने मात्र जिल्हा प्रशासनाला टँकरची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. येथील संभाव्य पाणीटंचाईबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ७२ लाख रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.मालवण तालुक्याला सध्या पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. पाणीटंचाईच्या निवारणार्थ मालवण पंचायत समितीतर्फे सभापती सीमा परुळेकर, उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी संभाव्य पाणीटंचाई आराखड्यासाठी खास सभाही शुक्रवारी आयोजित केली होती.मालवण तालुक्यात जी पाणीटंचाई आहे त्या पाणीटंचाईचा आराखडा पंचायत समितीच्यावतीने जिल्हा प्रशासनास सादर केला. या आराखड्यात तालुक्यातील नळयोजना विशेष दुरुस्तीत वराड बौद्धवाडी, चौके कुळकरवाडी, असगणी तांबेवाडी, काळसे परबवाडी, श्रावण बाजारपेठ, मठबुद्रुक पाणलोसवाडी व लिंग्रजवाडी, वरची गुरामवाडी, वाईरकरवाडी, कांदळगाव मुळयेवाडी यांचा समावेश असून यासाठी सुमारे १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातून ९ वाड्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. इंधन विहीर दुरुस्तीसाठी चाफेखोल आवाटवाडी आणि वायंगवडे धनगरवाडी यांचा समावेश आहे. यासाठी २० हजार रुपये अपेक्षित आहेत. नवीन विंधन विहिरीसाठी असरोंडी दाडसखलवाडी, आंबडोस देवळामागील धनगरवाडी, आंबेरी डिचोलकरवाडी, आडवली, मालडी, आनंदव्हाळ सुकाळीवाडी व पलिकडची कदमवाडी, कांदळगांव शेमाडवाडी व पाताडेवाडी, कातवड धनगरवाडी व घाडीवाडी, काळसे धनगरवाडी, किर्लोस धनगरवाडी व गावठाणवाडी टेंब, कुंभारमाठ धनगरवाडी, कुडोपी बौद्धवाडी, कोळंब न्हिवे- आडारी टेंबवाडी, खोटले बौद्धवाडी, गोठणे सडेवाडी, चाफेखोल माळवाडी, चौके मांडखोलवाडी व थळकरवाडी, तारकर्ली खालचीवाडी, तिरवडे उगवतीवाडी, नांदरुख घरटणवाडी व पलिकडचीवाडी, नांदोस चव्हाणवाडी, पळसंब गावठाणसडा, राठीवडे सडेवाडी, मधलीवाडी, जांबडश्वरी, रेवंडी खालची-मधली-तांडेलवाडी, कांबळीवाडी, मधलीवाडी, वरची गुरामवाडी, कुंभारवाडी व कट्टा तेलीवाडी, वराड कुसरवेवाडी, पालववाडी यासह ६३ वाड्यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ४७ लाख २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तात्पुरती पूरक नळ योजना घेण्यासाठी काळसे-नमसवाडी, मसुरे देऊळवाडी, चौके वावळ्याचे भरड, महान महापुरुषवाडी, काळसे वरचावाडा, कांदळगांव देऊळवाडा, काजराटवाडी, पाताडेवाडी यांचा समावेश आहे. या आठ वाड्यांसाठी १० लाख ५० हजारांचा निधी आवश्यक आहे. विहिरी खोल करणे आणि गाळ काढणे यामध्ये हेदूळ खालची सावंत व कानडेवाडी, वराड देऊळवाडा व सावरवाड, काळसे बागवाडी, वायरी भूतनाथ किल्ला, चिंंदर सडेवाडी, बुधवळे बौद्धवाडी, पळसंब गावठण या ९ वाड्यांसाठी ९० हजार रुपयांची आवश्यकता आहे.मालवण तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर भासत असताना तालुका प्रशासनाने मात्र पाणीटंचाईच्या निवारणार्थ टँकरची गरज नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन किती निधी देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)