शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांकडून लोकांच्या अपेक्षांवर पाणी

By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST

नीतेश राणेंची जठारांवर टीका : देवगड, वैभववाडी वायफाय सुविधेबाबत माहिती

कणकवली : विद्यमान आमदारांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आमदारांनी स्वत:च कबूल केले आहे की, आपल्याकडून १0 टक्केच काम झाले. युती शासन आले तर उर्वरित काम करण्यात येईल. त्यामुळे ज्यांचा स्वत:वरच विश्वास नाही ते निवडणूक काय जिंकणार? आमदारांना प्रगती पुस्तक काढायला मुंबईला जावे लागते यातच त्यांचे अपयश सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर केला.कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही चांगले काम केले नाही. नुसती पोपटपंची केली. वैभववाडी बस डेपोचा नारळ फोडला. मात्र, पुढे काहीच केले नाही. या जागेचे संपादनदेखील झाले नाही. आगामी काळात आपण जनतेसमोर सत्य परिस्थिती आणणार आहे. मात्र, वैयक्तिक कोणतीही टीकाटिप्पणी करणार नाही. दूध डेअरी चालू केली म्हणतात परंतु त्यातील दूध कोल्हापूरहून आणले जाते. त्यात काम करणारे कामगार हे परप्रांतिय आहेत. त्यामुळे त्याबाबतची वाच्यता वेळ येताच आपण करू. सध्या कणकवली मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी आपण घेत आहोत. देवगडमध्ये १00 घरांमध्ये जावून आपण गणेश दर्शन घेतले आहे. तसेच कणकवलीतील खारेपाटण आणि काही ग्रामीण भागात लोकांमध्ये जावून आपण देवदर्शन घेतले. उवरित दोन दिवसात कणकवली शहर आणि वैभववाडी शहरातील गणेश दर्शन घेणार आहे. तसेच यावेळी आपण काँग्रेस कार्यकर्त्यांसह लोकांच्या घेतलेल्या भेटीमध्ये विद्यमान आमदारांबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेल्या नाराजीचा सूर दिसत आहे. नुसती पोपटपंची करून चालणार नाही. विजय सावंत यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत पत्रकारांनी छेडले असता त्या विषयावर आताच बोलणे उचित नाही. आधी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होवू दे चित्र स्पष्ट झाल्यावरच आपण बोलू, अशी बगल राणे यांनी दिली. आपण निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचे मुद्दे घेवून जाणार आहे. वैयक्तिक टीका टिप्पणीत रस नाही. प्रत्येक उमेदवाराने विकासात्मक स्पर्धा केली पाहिजे, असेही नीतेश राणे म्हणाले. (प्रतिनिधी)