शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

आमदारांकडून लोकांच्या अपेक्षांवर पाणी

By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST

नीतेश राणेंची जठारांवर टीका : देवगड, वैभववाडी वायफाय सुविधेबाबत माहिती

कणकवली : विद्यमान आमदारांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आमदारांनी स्वत:च कबूल केले आहे की, आपल्याकडून १0 टक्केच काम झाले. युती शासन आले तर उर्वरित काम करण्यात येईल. त्यामुळे ज्यांचा स्वत:वरच विश्वास नाही ते निवडणूक काय जिंकणार? आमदारांना प्रगती पुस्तक काढायला मुंबईला जावे लागते यातच त्यांचे अपयश सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर केला.कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही चांगले काम केले नाही. नुसती पोपटपंची केली. वैभववाडी बस डेपोचा नारळ फोडला. मात्र, पुढे काहीच केले नाही. या जागेचे संपादनदेखील झाले नाही. आगामी काळात आपण जनतेसमोर सत्य परिस्थिती आणणार आहे. मात्र, वैयक्तिक कोणतीही टीकाटिप्पणी करणार नाही. दूध डेअरी चालू केली म्हणतात परंतु त्यातील दूध कोल्हापूरहून आणले जाते. त्यात काम करणारे कामगार हे परप्रांतिय आहेत. त्यामुळे त्याबाबतची वाच्यता वेळ येताच आपण करू. सध्या कणकवली मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी आपण घेत आहोत. देवगडमध्ये १00 घरांमध्ये जावून आपण गणेश दर्शन घेतले आहे. तसेच कणकवलीतील खारेपाटण आणि काही ग्रामीण भागात लोकांमध्ये जावून आपण देवदर्शन घेतले. उवरित दोन दिवसात कणकवली शहर आणि वैभववाडी शहरातील गणेश दर्शन घेणार आहे. तसेच यावेळी आपण काँग्रेस कार्यकर्त्यांसह लोकांच्या घेतलेल्या भेटीमध्ये विद्यमान आमदारांबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेल्या नाराजीचा सूर दिसत आहे. नुसती पोपटपंची करून चालणार नाही. विजय सावंत यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत पत्रकारांनी छेडले असता त्या विषयावर आताच बोलणे उचित नाही. आधी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होवू दे चित्र स्पष्ट झाल्यावरच आपण बोलू, अशी बगल राणे यांनी दिली. आपण निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचे मुद्दे घेवून जाणार आहे. वैयक्तिक टीका टिप्पणीत रस नाही. प्रत्येक उमेदवाराने विकासात्मक स्पर्धा केली पाहिजे, असेही नीतेश राणे म्हणाले. (प्रतिनिधी)