शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खाडीत वसलेल्या बेटावर मतदार संख्या ७१, ग्रामपंचायतीला लागले निवडणुकीचे वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 19:17 IST

जैतापूर खाडीच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या गावालाही आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. केवळ ७८ लोकसंख्या, ७१ मतदार आणि ग्रामपंचायतीचे सदस्य मात्र ७.

विनोद पवार राजापूर : जैतापूर खाडीच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या गावालाही आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. केवळ ७८ लोकसंख्या, ७१ मतदार आणि ग्रामपंचायतीचे सदस्य मात्र ७. खाडीच्या पाण्याने वेढलेल्या या ऐतिहासिक बेटावर २७ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. राज्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून जुवे जैतापूरचा उल्लेख होतो. विशेष म्हणजे याठिकाणी एकदाही निवडणूक घ्यावी लागलेली नाही, याठिकाणी सर्व जागा बिनविरोधच होतात.या अनोख्या गावचे क्षेत्र अवघे ४५ हेक्टर एवढे आहे. गावात ३५ घरे आहेत. नोकरीनिमित्त येथील अनेक तरूण स्थलांतरित झाले आहेत. येथील पारंपरिक असलेला शेतीव्यवसाय सोडून आता तेथील लोक उपजीविकेसाठी मासेमारीकडे वळले आहेत. येथील परंपराही इतर ठिकाणच्या मानाने भिन्न असल्याचे दिसून येते. गावात तीन मंदिरे असून त्यातील रवळनाथाची पालखी दर ५० वर्षांनी गावात भक्तभेटीसाठी निघते. येथील शाळेत केवळ दोन विद्यार्थी आहेत अन् १ शिक्षक आहे. गावात अंगणवाडी आहे, पण त्यामध्ये मुलेच नाहीत. गावात नळपाणी योजना तयार करण्यात आली आहे. ती बोअरिंगवर तयार करण्यात आल्याने त्याची पाणीपट्टी ग्रामस्थांवर आकारली जात नाहीत. बोअरिंगचा सर्व खर्च ग्रामपंचायतीने उचलला आहे. विशेष म्हणजे या गावाच्या चारही बाजूंना खाडी असली तरी गावातील विहिरींचे पाणी गोड आहे.

गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीजुवे जैतापूर गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने या गावात कोणतेही वाहन येत नाही. या गावातील एकाही माणसाकडे वाहन नाही. केवळ होडीनेच ग्रामस्थांना बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवावा लागतो. 

आतापर्यंत चार सरपंचआतापर्यंत या ग्रामपंचायतीला केवळ चारच सरपंच झाले आहेत. १९६९ साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली, त्यानंतर लक्ष्मण फडके २० वर्षे, अनंत सरपोळे हे ५ वर्षे, विश्वनाथ कांबळी १० वर्षे तर दर्शना सरपोळे हे १० वर्षे सरपंच राहिले आहेत. ग्रामपंचायतीचे एकूण उत्पन्न वार्षिक ३८ हजारच्या घरात आहे.

प्रचारालाही कुणी फिरकत नाही...जुवे-जैतापूर गावात केवळ ७१ मतदार आहेत. त्यामुळे विधानसभा असो वा लोकसभा, जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती या भागाकडे सहसा कुणीच फिरकत नाही. केवळ ७१ मतदारांसाठी इकडे कोणता लोकप्रतिनिधी फिरकणार? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.

संभाजी राजेंना सुरक्षित ठेवले?हे गाव ऐतिहासिक मानले जाते. संभाजी राजांना ज्यावेळी संगमेश्वरनजीक अटक करण्यात आली, त्यावेळी अटकेची चाहूल लागल्याने संभाजीराजांनी ताराराणीला राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गात नेण्यास सांगितले. यावेळी सुरक्षित बेट म्हणून त्यांना जुवे जैतापूर येथे ठेवण्यात आले होते, असे येथील लोक आवर्जून सांगतात.

चार महिन्याचे धान्य एकदमप्रवास होडीतून करावा लागत असल्याने पावसाळ्यात बहुतांशवेळा गावातून कोणीही बाहेर पडत नाहीत. त्यामुळे या गावातील लोकांसाठीचे पावसाळ्याच्या चार महिन्यातील रेशनचे धान्य मे महिन्यातच दिले जाते. अनेक वर्षे याच पद्धतीने येथील काम सुरू आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक