शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

समुद्रात वावटळीचे तांडव

By admin | Updated: September 12, 2014 23:51 IST

विध्वंस टळला : पाण्याचा उभा स्तंभ

मालवण : मालवण चिवला बीच येथील दहा वाव समुद्रात शुक्रवारी सायंकाळी समुद्री वावटळीचा थरार स्थानिक मच्छिमारांना अनुभवास मिळाला. एका क्रिकेटच्या मैदानाएवढी या वावटळीची व्याप्ती होती. वावटळीच्या वाऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचा उभा स्तंभ आकाशापर्यंत पोहोचला होता. पाणी आणि वाऱ्याचे तांडव तब्बल ७ मिनिटे सुरू होते. ही वावटळ किनाऱ्यापर्यंत आली असती तर मोठा विध्वंस घडला असता, असे स्थानिकांनी सांगितले.याबाबतचे अधिक वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी चिवला बीच किनाऱ्यावर पारंपरिक मच्छिमार होड्यांची डागडुजी करीत असताना ६.३०च्या सुमारास अचानक काळोख दाटून आला. याचवेळी समुद्रात चक्राकार वाऱ्याची वावटळ तयार होत असल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आले. क्षणार्धात वावटळीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचा स्तंभ तयार झाला होता. हा स्तंभ आकाशापर्यंत उंच गेला होता.अशा प्रकारची समुद्री वावटळ पहिल्यांदाच अनुभवास मिळाली. ही वावटळ भयंकर अशीच होती. वावटळीचे तांडव किनाऱ्यापर्यंत आले असते, तर किनाऱ्यावर मोठा विध्वंस घडला असता, असे स्थानिक मच्छिमार भाई कासवकर म्हणाले. (प्रतिनिधी)