शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी केले होते वेशांतर

By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST

जाकादेवीतील बॅँक दरोडा : ६ दरोडेखोरांना मुंबईत पकडून रत्नागिरी पोलिसांनी केली मोहीम फत्ते

प्रकाश वराडकर -रत्नागिरीजाकादेवीतील सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या बॅँक शाखेवर २८ नोव्हेंबर २०१३ रोजी दुुुपारी ५ जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दहशत निर्माण करण्यासाठी अंदाधुंद गोळीबार करून एका कर्मचाऱ्याचा बळी घेतला व सुमारे १० लाखांचा ऐवज घेऊन इलेंट्रा कारने ते पसार झाले. अवघ्या दहा मिनिटात खेळ खल्लास, अशी ही स्थिती होती. पोलिसांची खरी अग्निपरीक्षा होती. पहिल्या आठ दिवसांत तपासाला दिशाच मिळत नव्हती. स्थानिकाने माहिती दिल्यानतंर तपासकामातील कोंडी फुटली व तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी तुषार पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शहर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईत जाऊन मोहीम फत्ते केली. बॅँक दरोड्यातील आरोपींना पकडणे सोपे नव्हते. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांनी तपासाचे खरे स्किल वापरले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी गॅरेजमध्ये कामगाराच्या वेशात काम करण्यापासून विविध वेशांतर हुबेहुब वठवित एकेका गुन्हेगाराला अलगद जाळ्यात पकडले. पाच आरोपींना मुंबईत, तर एकाला जाकादेवी परिसरात अटक झाली.दरोड्यातील राजेंद्रसिंंग नवलकिशोरसिंंग राजावत (२५, कल्याण), हरेशगिरी गुणवंतगिरी गोस्वामी (२५, कल्याण), शिवाजी ऊर्फ सागर बाळू विसे (२५), प्रशांत शेलार (मुंबई), निखिल मारुती सावंत (२४, डोंबिवली, मुंबई), प्रथमेश संतोष सावंत (१८, राई, सावंतवाडी, जिल्हा - रत्नागिरी) या सहा आरोपींना अटक झाली. आरोपींकडून रिव्हॉल्व्हर, पैसे हस्तगत करण्यात आले. दरोड्यासाठी वापरलेली इलेंट्रा कार ही दरोड्यातील आरोपी प्रशांत शेलार याचे नातेवाईक अनिल भोईर यांची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही गाडीही रत्नागिरी पोलिसांनी जप्त केली.जिल्ह्यात असा दरोडा पडण्याची ही पहिलीच घटना होती. बॅँकेच्या शाखेवर दुपारी १.२९ ते १.३८ या दहा मिनिटांच्या वेळात पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला होता. महिला कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावत ९ लाख ७० हजारांची रोख रक्कम घेऊन व दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून दरोडेखोरांनी इलेन्ट्रा गाडीने पलायन केले होते. गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पळालेल्या दरोडेखोरांपैकी चारजण सावर्डे येथून अन्य वाहनाने पसार झाले, तर एकजण इलेन्ट्राने पुढे गेला. त्यामुळे पोलिसांनाही त्यांनी चकविले. गाडीचा ४०० हा नंबरही बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गाडीची नंबरप्लेट नंतर राई परिसरातच एका ठिकाणी आढळून आली होती. अलिशान गाडी घेऊन वावरत असल्याने दरोडेखोरांबाबत कोणाला संशय आला नाही. त्यामुळे दरोड्यानंतर अलिशान गाडी पसार झाली होती. याप्रकरणी आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. दरोड्यासारख्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा छडा लावणे जिकरीचे व आव्हानात्मक काम होते. पहिल्या आठवड्यात भरकटलेला तपास स्थानिक नागरिकाने महत्त्वाची माहिती दिल्याने यशस्वी झाला.