शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: कुडाळ-मालवणमध्ये रंगतदार लढत; वैभव नाईकांच्या विजयात बंडखोर ठरणार का अडसर ?

By वैभव देसाई | Updated: October 7, 2019 05:53 IST

2014ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले होते.

- वैभव देसाई

गेल्या काही दिवसांपासून तळ कोकणातल्या राजकारणात वेगळ्याच उलथापालथी होत आहेत. कोण कोणाविरोधात कधी उभं राहतंय, याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. पण आता हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसतंय. भाजपाला राणेंची ताकद मिळाल्यानं साहजिकच स्वाभिमान संघटनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांसह कोकणातील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, एक वेगळंच बळ मिळालेलं आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात राणेंचं संघटन बऱ्यापैकी विस्तारलेलं आहे. अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत.

2014ला कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक नारायण राणेंचा पराभव करत 10,500 मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी या मतदारसंघात चौरंगी लढत होती. तेव्हा शिवसेनेच्या वैभव नाईकांना 71 हजार मते पडली होती, तर काँग्रेसकडून लढणाऱ्या नारायण राणेंनी 60,500 एवढं मताधिक्य मिळवलं होतं. भाजपाच्या बाब मोंडकर यांना 4500 मते आणि राष्ट्रवादीच्या पुष्पसेन सावंत यांना 2500 एवढी मते पडली होती. 2014ला नारायण राणेंचा पराभव करून वैभव नाईक राज्यात जाएंट किलर ठरले होते. परंतु तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे.

वैभव नाईकांची कुडाळ-मालवणमध्ये जनतेत पहिल्याएवढी लोकप्रियता राहिलेली नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कुडाळ-मालवणमध्ये जनतेशी निगडीत असलेल्या पाण्याचा प्रश्न असो, किंवा रस्त्यांची कामं प्रलंबित असल्यानं मतदारसंघात काहीशी त्यांच्याबद्दल नाराजी आहे. राणेंनी कोकणात भाजपाला बळ दिल्यानं एकंदरीत वैभव नाईकांच्या मार्गात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी वैभव नाईकांचा प्रचार करण्यास नकार दिल्याचं सांगितलं जातंय. राणेंचे समर्थक आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते दत्ता सामंत यांनी वैभव नाईकांविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळीच ते वैभव नाईकांसमोर मोठं आव्हान उभं करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु नाईकांनी सामंतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर तो बाद ठरवण्यात आला. आता नारायण राणे वैभव नाईकांविरोधात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर किंवा भाजपा नेते रणजित देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांना त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. असे असूनही दोन्ही पक्षातील बंडखोरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी मंचावर बोलवल्यास मी शिवसेनेच्या उमेदवाराचाही प्रचार करेन, असंही राणे म्हणाले होते. त्यामुळे एकंदरीतच राणेंच्या राजकारणाचा अंदाज लावलं कठीण आहे. वैभव नाईक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल, असे सूतोवाच नारायण राणेंनी केले आहेत. तसेच यंदा राणे आणि भाजपा एकत्र आल्यानं गेल्या निवडणुकीत वैभव नाईकांना मिळालेलं 10,500 एवढं मताधिक्य तोडणं फारसं अवघड नाही.

याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या मालवण येथील निवासस्थानी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाल्याचीही चर्चा आहे. कुडाळ- मालवणमधून आम्ही माघार घेतलेली नाही. भाजप नेतृत्वाशी चर्चा करून उमेदवार दिला जाईल, असेही राणेंनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुडाळ-मालवणमधून नारायण राणे रणजित देसाई की अतुल काळसेकर यांना वैभव नाईकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात की त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगतात हे काही वेळातच समजणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाल