शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

३७ मतांनी मिळवलेल्या विजयाने राणेंचे वजन वाढणार नाही- केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:00 IST

कणकवली नगरपंचायत यापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ताब्यात होती. त्यामुळे आता ३७ मतांनी मिळविलेल्या विजयाने राणेंचे कोणतेही राजकीय वजन वाढणार नाही.

सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायत यापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ताब्यात होती. त्यामुळे आता ३७ मतांनी मिळविलेल्या विजयाने राणेंचे कोणतेही राजकीय वजन वाढणार नाही. ते पूर्वी महाराष्ट्राचे नेते होते, आता ते सिंधुदुर्गापुरते मर्यादित आहेत, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी लगावला. मैत्रीपूर्ण लढतीमुळेच मतांचे विभाजन झाले. त्याचा फटका बसल्याची कबुलीही त्यांनी दिली.पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना-भाजपा युती करण्याचे मान्य झाले होते. पण आयत्यावेळी चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्यात आल्या हे योग्य नाही. जर युती करायची होती तर युतीच करायची. वैभववाडी येथे मैत्रीपूर्ण युती केल्याने पराभव झाला हे मोठे उदाहरण समोर असतानाही कणकवलीत त्याचा धडा घेतला नाही. त्यामुळेच मतांचे विभाजन झाले आणि त्यातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना अवघी ३७ मते कमी पडली. विजय हा विजय असतो, पण कणकवली राखली यात नवल काही नाही.