शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर भडकले

By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST

पावसाचा दणका : सर्वसामान्यांसह विक्रेतेही बेजार

प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडीगेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील बाजारातील भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, मंगळवारपासून पावसाचे सावट दूर झाल्याने भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरण्याची शक्यता विके्रत्यांनी वर्तविली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येत आहेत. याचा फटका ग्राहकांबरोबरच भाजी विक्रेत्यांनाही बसत आहे. वाढती महागाई सर्वसामान्य जनतेला जगणे नकोसे करुन टाकत असतानाच परतीच्या पावसानेही महागाई वाढविण्यात हातभार लावलेला आहे. शेतकऱ्यांना यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे भाज्यांचे उत्पन्न चांगले मिळणार असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले. गेल्या वर्षीच्या दरांच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. याचा फटका भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास भाज्यांचे दर पुन्हा वाढण्याचीही शक्यता आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने वाढसन २०१३ चा विचार करता कोथिंबीर १० रुपये पेंडी, कोबी २० रुपये किलो, मिरची ३० रुपये किलो, गाजर ४० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, वाली ४० रुपये किलो, वांगी ३० रुपये किलो, ढबू मिरची ३० रुपये किलो, दुधी २० रुपये किलो तर लिंबू दहा रुपयांना पाच नग अशा किमती होत्या. २०१४ च्या पावसाळ्यात फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो व कोथिंबीर २० रुपये पेंडी झाली होती. श्रावण महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचे दर वाढून फरसबी १२० रुपये, मिरची १२० रुपये, गाजर १२० रुपये, भेंडी ६० रुपये, वाली ६० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ५० रुपये प्रती किलो आणि कोेथिंबीर ४० रुपये पेंडी व लिंबू १० रुपये एक नग अशा पद्धतीने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. ४अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेतील भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली होती. ४याचा फटका सामान्य जनतेलाही बसला. यामुळे गेले काही दिवस भाज्यांचे दर गगनाला भिडले होते.४परंतु मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत भाज्यांच्या दरात घट होईल असे विक्रेत्यांना वाटत आहे. ४ दर वाढूनही भाज्यांची खरेदी-विक्रीची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होती. ऐन श्रावण महिन्यातही भाजी दरवाढीमुळे नागरिकांना मोठा फटका बसला होता. पावसाचा हंगाम संपूनही पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने याचा परिणाम भाजी पिकांवर होऊन भाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परतीच्या पावसामुळे फरसबीच्या दराने १२० रुपयांचा अंक गाठला. इतर भाज्यांचे दरही वाढले होते. परंतु पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हे दर पुन्हा एकदा खाली उतरले आहेत. यामध्ये फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ४० रुपये, गाजर ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वाल ४० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो तसेच कोथिंबीर २० रुपये पेंडी व लिंबू १० रुपयांना तीन नग अशी भाज्यांच्या दरात घट झाली आहे.