शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

भाज्यांचे दर भडकले

By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST

पावसाचा दणका : सर्वसामान्यांसह विक्रेतेही बेजार

प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडीगेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील बाजारातील भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, मंगळवारपासून पावसाचे सावट दूर झाल्याने भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरण्याची शक्यता विके्रत्यांनी वर्तविली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येत आहेत. याचा फटका ग्राहकांबरोबरच भाजी विक्रेत्यांनाही बसत आहे. वाढती महागाई सर्वसामान्य जनतेला जगणे नकोसे करुन टाकत असतानाच परतीच्या पावसानेही महागाई वाढविण्यात हातभार लावलेला आहे. शेतकऱ्यांना यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे भाज्यांचे उत्पन्न चांगले मिळणार असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले. गेल्या वर्षीच्या दरांच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. याचा फटका भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास भाज्यांचे दर पुन्हा वाढण्याचीही शक्यता आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने वाढसन २०१३ चा विचार करता कोथिंबीर १० रुपये पेंडी, कोबी २० रुपये किलो, मिरची ३० रुपये किलो, गाजर ४० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, वाली ४० रुपये किलो, वांगी ३० रुपये किलो, ढबू मिरची ३० रुपये किलो, दुधी २० रुपये किलो तर लिंबू दहा रुपयांना पाच नग अशा किमती होत्या. २०१४ च्या पावसाळ्यात फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो व कोथिंबीर २० रुपये पेंडी झाली होती. श्रावण महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचे दर वाढून फरसबी १२० रुपये, मिरची १२० रुपये, गाजर १२० रुपये, भेंडी ६० रुपये, वाली ६० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ५० रुपये प्रती किलो आणि कोेथिंबीर ४० रुपये पेंडी व लिंबू १० रुपये एक नग अशा पद्धतीने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. ४अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेतील भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली होती. ४याचा फटका सामान्य जनतेलाही बसला. यामुळे गेले काही दिवस भाज्यांचे दर गगनाला भिडले होते.४परंतु मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत भाज्यांच्या दरात घट होईल असे विक्रेत्यांना वाटत आहे. ४ दर वाढूनही भाज्यांची खरेदी-विक्रीची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होती. ऐन श्रावण महिन्यातही भाजी दरवाढीमुळे नागरिकांना मोठा फटका बसला होता. पावसाचा हंगाम संपूनही पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने याचा परिणाम भाजी पिकांवर होऊन भाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परतीच्या पावसामुळे फरसबीच्या दराने १२० रुपयांचा अंक गाठला. इतर भाज्यांचे दरही वाढले होते. परंतु पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हे दर पुन्हा एकदा खाली उतरले आहेत. यामध्ये फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ४० रुपये, गाजर ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वाल ४० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो तसेच कोथिंबीर २० रुपये पेंडी व लिंबू १० रुपयांना तीन नग अशी भाज्यांच्या दरात घट झाली आहे.