शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
4
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
5
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
6
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
7
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
8
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
9
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
10
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
11
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
12
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
13
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
14
गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तांवर लेक टीनाने सोडलं मौन, म्हणाली - "स्वतःला या कुटुंबाचा..."
15
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
16
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
17
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
18
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
19
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
20
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला

वस्तीशाळा शिक्षकांचे भवितव्य अधांतरीच

By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST

जादा शिक्षक : ८४ शिक्षकांच्या कुटुंबीयांचे हाल संपणार कधी

रत्नागिरी : वस्तीशाळांमधील निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायम करण्याचा निर्णय झाला असला तरी त्यांचे भवितव्य अजूनही अधांतरीत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपेक्षा जादा शिक्षक असल्याने त्याचा फटका या वस्तीशाळांतील निमशिक्षकांना बसला आहे.जिल्ह्यात दुर्गम, डोंगराळ भागातील वाडीवस्त्यांवरील वस्तीशाळा काही वर्षांपूर्वी सुरु करण्यात आल्या. जिल्ह्यात ९१ वस्तीशाळा होत्या. या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शाळाही बंद करण्यात आल्या.या शाळांवरील निमशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर कंत्राटी शिक्षक म्हणून काम करीत होते, तर वस्तीशाळांमधील काही शिक्षकांनी नोकरी सोडून अन्य मार्ग पत्करला होता. वस्तीशाळांच्या या शिक्षकांना कायम करण्याची मागणी अनेकदा शासनाकडे केली होती. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही जिल्ह्यातील ८४ शिक्षक अल्प मानधनामध्ये कंत्राटी पध्दतीने काम करीत होते. शिक्षकांप्रमाणे पूर्णवेळ काम करणाऱ्या या शिक्षकांच्या किरकोळ मानधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वेळोवेळी करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार करुन शासनाने फेबु्रवारी, २०१४ मध्ये त्यांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा जिल्ह्यातील ८४ शिक्षकांना होणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. मात्र, शासनाचा निर्णय होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप त्यांना कायम करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपेक्षा जादा शिक्षकांचा प्रश्न सुटलेला नसल्याने या शिक्षकांवर अजूनही टांगती तलवार कायम आहे.जिल्ह्यातील वस्तीशाळा व त्यामधील शिक्षक यांचे प्रमाण हा नेहमी चर्चेचा मुद्दा असतो. जिल्ह्यात ८४ शिक्षक अल्प मानधनामध्ये कंत्राटी पध्दतीने काम करतात. या शिक्षकांचे काम पूर्णवेळ सुरू असून तुटपंूज्या मानधनामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)८४ शिक्षकांना अल्प मानधनशासनाकडून मागण्यांचा विसरजिल्ह्यात ९१ वस्तीशाळामंजूर पदांपेक्षा जादा शिक्षकांमुळे निमशिक्षकांना फटकाशिक्षकाचा दर्जा द्यावा