शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

अनंत म्हाडे : एकदिल अन् एकजुटीनेच दारूबंदीही जारी

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावातील तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विशेष भर देण्यात आला. गावामध्ये शांतता राखण्यात यशस्वी झाल्यामुळेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत तीन वर्षानंतर शांतता पुरस्कारासाठी ‘शेंबवणे’ गावाची निवड करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थ एकजुटीने, एकदिलाने विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. शिवाय गावात दारूबंदी करण्यात आली आहे. पुरस्कारामागे समस्त गावाचेच श्रेय असल्याचे ‘शेंबवणे’ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनंत म्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास २००७ पासून सुरूवात झाली. या मोहिमेतंर्गत ८५१ ग्रामपंचायतीपैकी आतापर्यत १६ गावे शांतता पुरस्काराचे मानकरी ठरली आहेत. २०१० नंतर शांतता पुरस्कार जाहीर झाले नव्हते. मात्र या वर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गावाने १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. शेंबवणे गावाची लोकसंख्या ११३२ इतकी असून चार वाड्या आहेत. गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्याकडे तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला. विशेषत: गावात दिवाणी, महसूली तंटे नसल्यामुळे पोलिसस्थानकांतर्गत असलेले चार फौजदारी तंटे पोलिसांच्या मदतीने सोडविण्यात यश आल्याचे अनंत म्हाडे यांनी सांगितले. गेली दोन वर्षे म्हाडे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असला तरी सार्वजनिक उपक्रम म्हणून गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवातंर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. हुंडा देणे व घेणे गुन्हा आहे, याचे समाज प्रबोधन करण्यात आले. गावातील मुलींबरोबर सुना देखील सुखाने नांदाव्यात यासाठी ‘हुंडाबंदी’ ला मान्यता देण्यात आली आहे.‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ संकल्पना ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असताना प्रत्येक वाडीत रॅली काढण्यात आली. घोषवाक्यांबरोबरच पथनाट्यातून स्वच्छतेसाठी प्रबोधन करण्यात आले. गावाने वाडीवार राबविलेल्या स्वच्छता अभियानात ग्रामस्थ उत्स्फूर्तरित्या सहभाग नोंदविला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतंर्गत गावात दोन बंधारे वर्षभरात बांधण्यात आले असल्याची माहिती म्हाडे यांनी दिली. शैक्षणिक उपक्रमातंर्गत गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे, वह्यांचे वाटप करण्यात आले. हुंडाबंदी, स्वच्छता, पाणी टंचाई बाबत समाजप्रबोधनाकरीता विद्यार्थी वर्गही सहभागी झाला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रबोधन करण्यात येत असतानाच या कार्यक्रमांसाठी अनुदान देण्यात आले आहे. कोकणात गणेशोत्सव व होळीचा सण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय गावातील हौशे गवशे सहभागी होत असल्याने या दिवसात तंटे उदभवण्याची भिती सर्वाधिक असते. परंतु प्रत्येक सणापूर्वी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गावात बैठका घेवून कार्यक्रम शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाल्यानेच गाव शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. प्रत्येक कार्यक्रमातील ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनिय असल्याने गावात शांतता नांदत असल्याचे म्हाडे यांनी सांगितले.मोहिमेंतर्गत ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १६ गावे शांतता पुरस्काराची मानकरी.यावर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गाव १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी.गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्यासाठी तंटामुक्त समितीने घेतला पुढाकार.