शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

अनंत म्हाडे : एकदिल अन् एकजुटीनेच दारूबंदीही जारी

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावातील तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विशेष भर देण्यात आला. गावामध्ये शांतता राखण्यात यशस्वी झाल्यामुळेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत तीन वर्षानंतर शांतता पुरस्कारासाठी ‘शेंबवणे’ गावाची निवड करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थ एकजुटीने, एकदिलाने विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. शिवाय गावात दारूबंदी करण्यात आली आहे. पुरस्कारामागे समस्त गावाचेच श्रेय असल्याचे ‘शेंबवणे’ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनंत म्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास २००७ पासून सुरूवात झाली. या मोहिमेतंर्गत ८५१ ग्रामपंचायतीपैकी आतापर्यत १६ गावे शांतता पुरस्काराचे मानकरी ठरली आहेत. २०१० नंतर शांतता पुरस्कार जाहीर झाले नव्हते. मात्र या वर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गावाने १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. शेंबवणे गावाची लोकसंख्या ११३२ इतकी असून चार वाड्या आहेत. गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्याकडे तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला. विशेषत: गावात दिवाणी, महसूली तंटे नसल्यामुळे पोलिसस्थानकांतर्गत असलेले चार फौजदारी तंटे पोलिसांच्या मदतीने सोडविण्यात यश आल्याचे अनंत म्हाडे यांनी सांगितले. गेली दोन वर्षे म्हाडे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असला तरी सार्वजनिक उपक्रम म्हणून गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवातंर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. हुंडा देणे व घेणे गुन्हा आहे, याचे समाज प्रबोधन करण्यात आले. गावातील मुलींबरोबर सुना देखील सुखाने नांदाव्यात यासाठी ‘हुंडाबंदी’ ला मान्यता देण्यात आली आहे.‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ संकल्पना ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असताना प्रत्येक वाडीत रॅली काढण्यात आली. घोषवाक्यांबरोबरच पथनाट्यातून स्वच्छतेसाठी प्रबोधन करण्यात आले. गावाने वाडीवार राबविलेल्या स्वच्छता अभियानात ग्रामस्थ उत्स्फूर्तरित्या सहभाग नोंदविला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतंर्गत गावात दोन बंधारे वर्षभरात बांधण्यात आले असल्याची माहिती म्हाडे यांनी दिली. शैक्षणिक उपक्रमातंर्गत गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे, वह्यांचे वाटप करण्यात आले. हुंडाबंदी, स्वच्छता, पाणी टंचाई बाबत समाजप्रबोधनाकरीता विद्यार्थी वर्गही सहभागी झाला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रबोधन करण्यात येत असतानाच या कार्यक्रमांसाठी अनुदान देण्यात आले आहे. कोकणात गणेशोत्सव व होळीचा सण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय गावातील हौशे गवशे सहभागी होत असल्याने या दिवसात तंटे उदभवण्याची भिती सर्वाधिक असते. परंतु प्रत्येक सणापूर्वी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गावात बैठका घेवून कार्यक्रम शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाल्यानेच गाव शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. प्रत्येक कार्यक्रमातील ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनिय असल्याने गावात शांतता नांदत असल्याचे म्हाडे यांनी सांगितले.मोहिमेंतर्गत ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १६ गावे शांतता पुरस्काराची मानकरी.यावर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गाव १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी.गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्यासाठी तंटामुक्त समितीने घेतला पुढाकार.