शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

अनंत म्हाडे : एकदिल अन् एकजुटीनेच दारूबंदीही जारी

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावातील तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विशेष भर देण्यात आला. गावामध्ये शांतता राखण्यात यशस्वी झाल्यामुळेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत तीन वर्षानंतर शांतता पुरस्कारासाठी ‘शेंबवणे’ गावाची निवड करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थ एकजुटीने, एकदिलाने विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. शिवाय गावात दारूबंदी करण्यात आली आहे. पुरस्कारामागे समस्त गावाचेच श्रेय असल्याचे ‘शेंबवणे’ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनंत म्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास २००७ पासून सुरूवात झाली. या मोहिमेतंर्गत ८५१ ग्रामपंचायतीपैकी आतापर्यत १६ गावे शांतता पुरस्काराचे मानकरी ठरली आहेत. २०१० नंतर शांतता पुरस्कार जाहीर झाले नव्हते. मात्र या वर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गावाने १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. शेंबवणे गावाची लोकसंख्या ११३२ इतकी असून चार वाड्या आहेत. गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्याकडे तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला. विशेषत: गावात दिवाणी, महसूली तंटे नसल्यामुळे पोलिसस्थानकांतर्गत असलेले चार फौजदारी तंटे पोलिसांच्या मदतीने सोडविण्यात यश आल्याचे अनंत म्हाडे यांनी सांगितले. गेली दोन वर्षे म्हाडे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असला तरी सार्वजनिक उपक्रम म्हणून गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवातंर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. हुंडा देणे व घेणे गुन्हा आहे, याचे समाज प्रबोधन करण्यात आले. गावातील मुलींबरोबर सुना देखील सुखाने नांदाव्यात यासाठी ‘हुंडाबंदी’ ला मान्यता देण्यात आली आहे.‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ संकल्पना ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असताना प्रत्येक वाडीत रॅली काढण्यात आली. घोषवाक्यांबरोबरच पथनाट्यातून स्वच्छतेसाठी प्रबोधन करण्यात आले. गावाने वाडीवार राबविलेल्या स्वच्छता अभियानात ग्रामस्थ उत्स्फूर्तरित्या सहभाग नोंदविला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतंर्गत गावात दोन बंधारे वर्षभरात बांधण्यात आले असल्याची माहिती म्हाडे यांनी दिली. शैक्षणिक उपक्रमातंर्गत गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे, वह्यांचे वाटप करण्यात आले. हुंडाबंदी, स्वच्छता, पाणी टंचाई बाबत समाजप्रबोधनाकरीता विद्यार्थी वर्गही सहभागी झाला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रबोधन करण्यात येत असतानाच या कार्यक्रमांसाठी अनुदान देण्यात आले आहे. कोकणात गणेशोत्सव व होळीचा सण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय गावातील हौशे गवशे सहभागी होत असल्याने या दिवसात तंटे उदभवण्याची भिती सर्वाधिक असते. परंतु प्रत्येक सणापूर्वी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गावात बैठका घेवून कार्यक्रम शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाल्यानेच गाव शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. प्रत्येक कार्यक्रमातील ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनिय असल्याने गावात शांतता नांदत असल्याचे म्हाडे यांनी सांगितले.मोहिमेंतर्गत ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १६ गावे शांतता पुरस्काराची मानकरी.यावर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गाव १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी.गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्यासाठी तंटामुक्त समितीने घेतला पुढाकार.