शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जलसंधारणासाठी चिरेखाणींचा उपयोग

By admin | Updated: November 11, 2016 22:33 IST

सदाशिव ओगले यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हा नियोजन समिती सभेत लावून धरली मागणी

देवगड : जिल्हा नियोजन समितीमध्ये गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देवगड तालुक्यातील जांभ्या दगडांच्या चिरेखाणींचा उपयोग जलसंधारणासाठी करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिव ओगले यांनी दिली आहे. १४ आॅक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या विकास समितीच्या सभेमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित विभागांची बैठक घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सदस्य सदाशिव ओगले यांच्यासमवेत कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग, डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन या सर्वांची एकत्रित बैठक ५ नोव्हेंबर रोजी घेतली होती. या बैठकीमध्ये देवगड तालुक्यातील प्रायोगिक स्वरुपात १० ते १२ ठिकाणी जांभ्या दगडांच्या चिरेखाणींमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे ठरले. यामध्ये दोन प्रकारे हा प्रकल्प राबविता येणार असल्याचे ओगले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)