शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 27, 2023 18:37 IST

मागील घटना, घडामोडींवर पडदा

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर तब्बल १४ वर्षांनंतर भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी ही भेट घेतल्याचे केसरकर आणि राणे यांनी सांगितले असले तरी मागील १४ वर्षांत राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय विरोध आता मावळला असून आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील चित्र वेगळेच दिसणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.सन २००९ साली मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर सिंधुदुर्गमधील विधानसभेचा एक मतदार संघ कमी होऊन तीन नव्याने मतदार संघ झाले. त्यात कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तीन तालुक्यांसाठी कणकवली मतदार संघ. कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांसाठी कुडाळ मतदार संघ आणि सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी सावंतवाडी मतदार संघाची निर्मिती झाली होती.यावेळच्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. त्यावेळी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. या निवडणुकीत दीपक केसरकर यांनी नारायण राणेंची भेट घेऊन त्यांच्या कृपाशीर्वादानेच आणि पाठिंब्यांमुळे केसरकर पहिल्यांदा आमदार झाले होते.त्यानंतर मात्र, २०१४ आणि २०१९ च्या दोन निवडणुकांमध्ये केसरकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली. राणेंशी राजकीय वैर पत्करून त्यांनी त्यांच्या धेय धोरणांना वेळोवेळी विरोध करत या दोघांमध्ये टोकाचे राजकीय संघर्ष जिल्हावासीयांनी अनुभवले आहेत. या १४ वर्षांच्या कालावधीत केसरकर जरी दोन वेळा आमदार झाले असले, तरी त्यांच्या मतदार संघातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नारायण राणेंनीच बाजी मारली होती.

भाजप, शिंदे सेनेमुळे दिलजमाई

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ४० आमदारांसह भाजपाशी संधान बांधून भाजप शिंदे सेना यांचे एकत्रित सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये दीपक केसरकर हे शिंदे सेनेत मंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रवक्ते झाल्याने आता युतीचा धर्म म्हणून केसरकर यांना भाजपाकडून केंद्रात मंत्री असलेल्या राणेंशी जमवून घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर केसरकर आणि राणे एकत्र येण्याची चाहूल लागली होती.मागील घटना, घडामोडींवर पडदासिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण आता १४ वर्षांनंतर त्याच वळणावर येऊन पोहोचले आहे. केसरकर यांना राणेंची गरज वाटू लागली. त्यामुळे राणेंच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गचा विकास करणार असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा मागील सर्व घटना, घडामोंडीवर पडदा टाकला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे