शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:03 IST

शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर शिवजयंतीनिमित्त विचार वैभव व्याख्यानमालेत आवाहन

वैभववाडी : शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला फक्त तलवार दिसते. मात्र या तलवारी पलिकडचे आणि तलवारीमागचे तत्व आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचा राज्याभिषेक आपण समजून घेतल्याशिवाय त्यांचे चरित्र आपण समजून घेऊ शकत नाही. त्यांनी आपल्या राज्यात शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या,  असे बंडगर महाराज पुढे म्हणाले.

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व सत्यशोधक सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विचारवैभव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतकुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बंडगर महाराज यांनी मत मांडले.बंडगर महाराज पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाजांचा संघर्ष कोणत्या एका जातीच्या अथवा धर्माच्या विरोधात नव्हता. म्हणूनच सर्व जाती, धर्माचे लोक त्यांच्यासाठी स्वत:चा जीव द्यायला तयार असत. तसेच त्यांच्यावर संत परंपरेचा प्रभाव होता.महारांच्या स्वराज्याची तात्विकता ही संत परंपरेची आहे. तत्कालीन वतनदारीला वेसन घालून वतनदारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या रयतेला मुक्त केले. आजच्या वतनदारांनाही बंगला, गाडी सर्व सेवा सुविधा मोफत दिल्या जात असल्याचा टोला राजकर्त्यांना लगावत त्यांनाही आपण याबाबत जाब विचारला पाहीजे.महाराजांनी आपल्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली. गुलामाच्या व्यापारावर बंदी घातली. सर्व जातीधर्माच्या लोकांना समानसंधी देऊन स्वराज्यामध्ये जातीय सलोखा निर्माण केला. मात्र तत्कालीन काही उच्चवर्णीयांना ते पटले नाही. त्यांनी महारांजाच्या विरोधात कटकारस्थाने केली. त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. महाराजांचे स्वराज्य आपल्याकडे कसे येईल यासाठी प्रयत्न केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील समतेचे अंगीकार केला असता; तर आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आलेच नसते. असे ही बंडगर महाराज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान समजून घेत त्यांचा वारसा आपण जोपासला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले. तर राजेश कळसुलकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीsindhudurgसिंधुदुर्ग