शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:03 IST

शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर शिवजयंतीनिमित्त विचार वैभव व्याख्यानमालेत आवाहन

वैभववाडी : शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला फक्त तलवार दिसते. मात्र या तलवारी पलिकडचे आणि तलवारीमागचे तत्व आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचा राज्याभिषेक आपण समजून घेतल्याशिवाय त्यांचे चरित्र आपण समजून घेऊ शकत नाही. त्यांनी आपल्या राज्यात शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या,  असे बंडगर महाराज पुढे म्हणाले.

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व सत्यशोधक सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विचारवैभव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतकुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बंडगर महाराज यांनी मत मांडले.बंडगर महाराज पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाजांचा संघर्ष कोणत्या एका जातीच्या अथवा धर्माच्या विरोधात नव्हता. म्हणूनच सर्व जाती, धर्माचे लोक त्यांच्यासाठी स्वत:चा जीव द्यायला तयार असत. तसेच त्यांच्यावर संत परंपरेचा प्रभाव होता.महारांच्या स्वराज्याची तात्विकता ही संत परंपरेची आहे. तत्कालीन वतनदारीला वेसन घालून वतनदारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या रयतेला मुक्त केले. आजच्या वतनदारांनाही बंगला, गाडी सर्व सेवा सुविधा मोफत दिल्या जात असल्याचा टोला राजकर्त्यांना लगावत त्यांनाही आपण याबाबत जाब विचारला पाहीजे.महाराजांनी आपल्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली. गुलामाच्या व्यापारावर बंदी घातली. सर्व जातीधर्माच्या लोकांना समानसंधी देऊन स्वराज्यामध्ये जातीय सलोखा निर्माण केला. मात्र तत्कालीन काही उच्चवर्णीयांना ते पटले नाही. त्यांनी महारांजाच्या विरोधात कटकारस्थाने केली. त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. महाराजांचे स्वराज्य आपल्याकडे कसे येईल यासाठी प्रयत्न केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील समतेचे अंगीकार केला असता; तर आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आलेच नसते. असे ही बंडगर महाराज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान समजून घेत त्यांचा वारसा आपण जोपासला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले. तर राजेश कळसुलकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीsindhudurgसिंधुदुर्ग