शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:03 IST

शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर शिवजयंतीनिमित्त विचार वैभव व्याख्यानमालेत आवाहन

वैभववाडी : शिवाजी महाराजांना कोणीही जातीधर्मात बंदिस्त करुन त्यांचे कार्य संकुचित करु नये, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला फक्त तलवार दिसते. मात्र या तलवारी पलिकडचे आणि तलवारीमागचे तत्व आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचा राज्याभिषेक आपण समजून घेतल्याशिवाय त्यांचे चरित्र आपण समजून घेऊ शकत नाही. त्यांनी आपल्या राज्यात शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या,  असे बंडगर महाराज पुढे म्हणाले.

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व सत्यशोधक सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विचारवैभव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतकुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर बंडगर महाराज यांनी मत मांडले.बंडगर महाराज पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाजांचा संघर्ष कोणत्या एका जातीच्या अथवा धर्माच्या विरोधात नव्हता. म्हणूनच सर्व जाती, धर्माचे लोक त्यांच्यासाठी स्वत:चा जीव द्यायला तयार असत. तसेच त्यांच्यावर संत परंपरेचा प्रभाव होता.महारांच्या स्वराज्याची तात्विकता ही संत परंपरेची आहे. तत्कालीन वतनदारीला वेसन घालून वतनदारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या रयतेला मुक्त केले. आजच्या वतनदारांनाही बंगला, गाडी सर्व सेवा सुविधा मोफत दिल्या जात असल्याचा टोला राजकर्त्यांना लगावत त्यांनाही आपण याबाबत जाब विचारला पाहीजे.महाराजांनी आपल्या स्वराज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली. गुलामाच्या व्यापारावर बंदी घातली. सर्व जातीधर्माच्या लोकांना समानसंधी देऊन स्वराज्यामध्ये जातीय सलोखा निर्माण केला. मात्र तत्कालीन काही उच्चवर्णीयांना ते पटले नाही. त्यांनी महारांजाच्या विरोधात कटकारस्थाने केली. त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. महाराजांचे स्वराज्य आपल्याकडे कसे येईल यासाठी प्रयत्न केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील समतेचे अंगीकार केला असता; तर आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आलेच नसते. असे ही बंडगर महाराज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्वज्ञान समजून घेत त्यांचा वारसा आपण जोपासला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले. तर राजेश कळसुलकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीsindhudurgसिंधुदुर्ग