शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: May 28, 2024 16:13 IST

सावंतवाडी कणकवली शहरात ही लवकरच भूमिगत विद्युत वाहिन्या

सावंतवाडी : राज्य सरकार समुद्र किनारपट्टीवर ९०० कोटी खर्च करून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. तसेच  कणकवली व सावंतवाडी शहरांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी आचारसंहिता शिथिल झाल्यावर त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री केसरकर म्हणाले, अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास सहकार्य करावे. आचारसंहितेनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यात हा निर्णय घेतला जाईल. दोडामार्ग तालुक्यातील महालक्ष्मी कंपनीच्या वीज वितरणासाठी लाईन टाकताना शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.सावंतवाडी शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर असताना ते काम केले नाही तेच आता बोलत आहेत, अशी टिका साळगावकर यांचे नाव न घेता केसरकर यांनी केली. मात्र आचारसंहितेनंतर सावंतवाडी व कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी प्रस्ताव तयार केले जाईल व शासनाला तो सादर करून मजुरी मिळवू असेही ते म्हणाले. भगवतगीता पाठ, मनुस्मृतीबाबत चुकीच्या चर्चा भगवतगीता पाठ, मनुस्मृती बाबतीत चुकीच्या चर्चा सुरू आहेत. शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. समितीने प्रस्ताव सादर केला तो फुटला आणि चर्चा सुरू झाली आहे. खरे तर स्पर्धा परीक्षा, सीबीएससीमध्ये हे पाठ, श्लोक आहेत. विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी पाठ, श्लोक ठेवला आहे त्याबद्दल प्रत्येकाने खातरजमा करून घ्यावी, ती प्रस्तावना आहे असेही केसरकर यांनी सांगितले.वीज वितरण बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कोकणामध्ये अतिवृष्टी होते असलेल्या ठिकाणी  पावसाळ्यात वीज वितरण कंपनीला पायाभूत सुविधांची गरज आहे. पायाभूत सुविधा देताना कोकणासाठी वीज वितरण कंपनीला कर्मचाऱ्यांची गरज आहे. ही त्याच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले. वीज वितरणचे काम सुरळीतपणे व्हावे आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गDeepak Kesarkarदीपक केसरकर