शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

कणकवली नगरपंचायत बिल्डरांच्या ताब्यात

By admin | Updated: July 10, 2014 00:08 IST

शैलेश भोगले : मनसेने समस्यांबद्दल मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब

कणकवली : नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार सुरू असून ती बिल्डर्स, ठेकेदार आणि निष्क्रीय नगरसेवकांच्या कह्यात गेल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नसून आंधळं दळतं आणि कुत्रे पीठ खाते अशी स्थिती झाली आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शैलेश भोगले यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक, महिला तालुकाध्यक्ष तेजल लिंग्रस, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राणे, उपतालुकाध्यक्ष समीर आचरेकर, शहर अध्यक्ष शैलेंद्र नेरकर, शरद सरंगले, बाळू टिकले आदींनी बुधवारी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत जाब विचारला. शैलेश भोगले म्हणाले की, शहरात अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. मुख्याधिकारी ठेकेदार, बिल्डर्स, नगरसेवकांच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांचे या समस्यांकडे लक्ष नसून त्यांच्याकडून कोणतीही समस्या हाताळली जात नाही. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दोनपैकी एक मशिन बंद पडल्याने शहरात एकाच फॉगिंग मशिनद्वारे डासप्रतिबंधक फवारणी केली जात आहे. फॉगिंग मशिनच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने स्वखर्चातून येत्या आठ दिवसांत दोन फॉगिंग मशिन घेणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शहरातील गटारे ठिकठिकाणी बंद करण्यात आली आहेत. गेली तीन वर्षे भुयारी गटार योजनेसंदर्भात चर्चाच करण्यात येत असून मंजुरी मिळण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर प्रत्यक्षात योजना केव्हा कार्यरत होणार, असा प्रश्न भोगले यांनी केला. शहरातील फेरीवाल्यांकडून पावत्या न देता शुल्क आकारणी करण्यात येत आहे. फेरीवाल्यांची यादी नगरपंचायतीकडे नाही. अनियंत्रीत फेरीवाल्यांमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. जलशुद्धीकरण दोन महिने बंद जलशुद्धीकरण प्रकल्पाची यंत्रणा गेले दोन महिने बंदच आहे. टीसीएल पावडर गेले तीन महिने वापरण्यात आली नाही. ३०० किलो पावडर केंद्रात पडून आहे. पाण्यात किती पावडर टाकायची याचे प्रमाण कर्मचाऱ्यांना माहित नाही. शहरातील ५० टक्के विहिरी संकुलांच्या सांडपाण्याने दूषित झाल्या आहेत. सीईओ शहराबद्दल अनभिज्ञमुख्याधिकारी संतोष वारूळे शहरातील अनेक प्रश्नांबद्दल अनभिज्ञ आहेत. मच्छिमार्केट कुठे आहे याची त्यांना कल्पना नाही. शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भातही सीईओंनी पाहणी केलेली नाही. नियम धाब्यावर बसवून संकुले बांधल्याने सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)