शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

कणकवली नगरपंचायत बिल्डरांच्या ताब्यात

By admin | Updated: July 10, 2014 00:08 IST

शैलेश भोगले : मनसेने समस्यांबद्दल मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब

कणकवली : नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार सुरू असून ती बिल्डर्स, ठेकेदार आणि निष्क्रीय नगरसेवकांच्या कह्यात गेल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीच्या कारभारावर कोणाचाही अंकुश नसून आंधळं दळतं आणि कुत्रे पीठ खाते अशी स्थिती झाली आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शैलेश भोगले यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक, महिला तालुकाध्यक्ष तेजल लिंग्रस, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राणे, उपतालुकाध्यक्ष समीर आचरेकर, शहर अध्यक्ष शैलेंद्र नेरकर, शरद सरंगले, बाळू टिकले आदींनी बुधवारी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत जाब विचारला. शैलेश भोगले म्हणाले की, शहरात अनेक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. मुख्याधिकारी ठेकेदार, बिल्डर्स, नगरसेवकांच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांचे या समस्यांकडे लक्ष नसून त्यांच्याकडून कोणतीही समस्या हाताळली जात नाही. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डर्सवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दोनपैकी एक मशिन बंद पडल्याने शहरात एकाच फॉगिंग मशिनद्वारे डासप्रतिबंधक फवारणी केली जात आहे. फॉगिंग मशिनच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने स्वखर्चातून येत्या आठ दिवसांत दोन फॉगिंग मशिन घेणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शहरातील गटारे ठिकठिकाणी बंद करण्यात आली आहेत. गेली तीन वर्षे भुयारी गटार योजनेसंदर्भात चर्चाच करण्यात येत असून मंजुरी मिळण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर प्रत्यक्षात योजना केव्हा कार्यरत होणार, असा प्रश्न भोगले यांनी केला. शहरातील फेरीवाल्यांकडून पावत्या न देता शुल्क आकारणी करण्यात येत आहे. फेरीवाल्यांची यादी नगरपंचायतीकडे नाही. अनियंत्रीत फेरीवाल्यांमुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. जलशुद्धीकरण दोन महिने बंद जलशुद्धीकरण प्रकल्पाची यंत्रणा गेले दोन महिने बंदच आहे. टीसीएल पावडर गेले तीन महिने वापरण्यात आली नाही. ३०० किलो पावडर केंद्रात पडून आहे. पाण्यात किती पावडर टाकायची याचे प्रमाण कर्मचाऱ्यांना माहित नाही. शहरातील ५० टक्के विहिरी संकुलांच्या सांडपाण्याने दूषित झाल्या आहेत. सीईओ शहराबद्दल अनभिज्ञमुख्याधिकारी संतोष वारूळे शहरातील अनेक प्रश्नांबद्दल अनभिज्ञ आहेत. मच्छिमार्केट कुठे आहे याची त्यांना कल्पना नाही. शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भातही सीईओंनी पाहणी केलेली नाही. नियम धाब्यावर बसवून संकुले बांधल्याने सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)