शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

अनधिकृत बांधकामे फोफावली

By admin | Updated: February 21, 2017 05:59 IST

ठाणे आणि उल्हानसगर महापालिकांचा तापलेला माहोल, त्यात गुंतलेली पालिकेची यंत्रणा पाहून अनधिकृत बांधकामे

ठाणे : ठाणे आणि उल्हानसगर महापालिकांचा तापलेला माहोल, त्यात गुंतलेली पालिकेची यंत्रणा पाहून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी हातपाय पसरले आहेत. ठाणे, दिवा, उल्हासनगर परिसरात भराव टाकून रात्रीचा दिवस करत बांधकामे सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी शास्ती रद्द केल्याची घोषणा करताच आणि शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या बांधकामांना वेग आला आहे. यापूर्वी अर्धवट अवस्थेत असलेली बांधकामेही आता पूर्ण केली जात आहेत. दिवा परिसरात बेकायदा भराव घालून यापूर्वीच खारफुटी सुकवण्यात आली आहे. तेथे सध्या रात्रभर मातीचे ट्रक फिरत आहेत आणि भराव घातला जात आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकांच्या यंत्रणांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत त्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. दिवा परिसरात जाळलेल्या किंवा सुकवलेल्या खारफुटीच्या परिसरात, डम्पिंगच्या भागात सर्रास भरावाचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक बिल्डरांची त्याला फूस असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.उल्हासनगरमध्येही रातोरात बांधकामे उभी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यापूर्वी अर्धवट ठेवलेली बांधकामे पूर्ण केली जात आहेत किंवा पालिकेने जी बांधकामे अर्धवट अवस्थेत हातोडा मारून तोडली आहेत, ती पूर्ण केली जात आहेत. (प्रतिनिधी) केडीएमसीचे कानांवर हातकल्याण : बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयश आले असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने घर खरेदी करताना तुमची तुम्ही चौकशी करून घ्या, असे सांगत जबाबदारीपासून पाठ फिरवत हात वर केले आहेत. २७ गावांमध्ये चौकशी करून मगच घर घ्या. खोट्या व फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन करणारे पत्रकच पालिकेने काढले आहे. यातील १० गावे ग्रोथ सेंटर म्हणून जाहीर झाली आहेत. उरलेल्या १७ गावांमधील बेकायदा बांधकामांची यादी एमएमआरडीएने केडीएमसीला सप्टेंबरमध्ये दिली आहे. पण त्या ५५२ बांधकामांवर आजतागायत कारवाई झालेली नाही.