शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सीआरझेडबाबतच्या जमिनीचे सर्व्हे नंबर जाहीर करणार- उदय चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : मालवण व आचरा परिसरातील ज्या जमिनी सी व्ही सी ए (क्रिटीकली व्हलनरेबल सीआरझेड एरिया)मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत, त्या जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत वेबसाईटद्वारा जाहीर केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतीही मागविण्यात येणार आहेत.सागरी अधिनियमन ...

ठळक मुद्दे ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतींसाठी मुदतजैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक असलेली विविध संवेदनक्षम ठिकाणे यांचा समावेशमाहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : मालवण व आचरा परिसरातील ज्या जमिनी सी व्ही सी ए (क्रिटीकली व्हलनरेबल सीआरझेड एरिया)मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत, त्या जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत वेबसाईटद्वारा जाहीर केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतीही मागविण्यात येणार आहेत.

सागरी अधिनियमन क्षेत्र २०११ च्या परिपत्रकानुसार मालवण व आचरा या परिसरातील सीआरझेड अंतर्गत येणारे नकाशे जाहीर करण्यात आले होते. त्यावर नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर सागरी अधिनियम संवेदनक्षम क्षेत्रात येणाºया जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये सीआरझेड १ अ नकाशात येणाºया जमिनींचा समावेश आहे. यामध्ये कांदळवन जंगल, कांदळवनसदृश जमिनी, खाडीलगतच्या पाणथळ जमिनी, जेथे पक्षी घरटी बांधतात अशी ठिकाणे, भरती सुकतीमधील ठिकाणे, अशी जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक असलेली विविध संवेदनक्षम ठिकाणे यांचा समावेश आहे.

सागरी अधिनियमात यापूर्वी मालवण, आचरा व रत्नागिरी यांचा सरसकट समावेश होता. मात्र, आता जिल्हाधिकाºयांकडून वरीलप्रमाणे ठिकाणे केवळ सागरी अधिनियमासाठी निश्चित करण्यात येणार आहेत.त्यामुळे जैवविविधतेसाठी व ती टिकण्यासाठी एक आराखडा बनविता येईल. तसेच सरसकट जो भाग सागरी अधिनियमात येत होता, तो न येता प्रत्यक्षात संवेदनक्षम असलेल्या भागाचाच समावेश यात होईल. असे किती क्षेत्र आहे याची परिपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत सर्व्हे नंबरसह जाहीर करण्यात येईल. त्यानंतर त्यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकती मागवून हे क्षेत्र निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.