शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विहिरीत पडले दोन गवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : शहरातील गोविंद नाट्यमंदिरच्या मागे असलेल्या विहिरीत मंगळवारी रात्री दोन गवे पडले. रात्रभर पाण्यात राहिल्याने यातील एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसºया गव्याला जीवदान देण्यात नागरिकांना यश आले. दरम्यान, दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवलेल्या गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. उशिराने घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या कर्मचाºयांनी गर्दीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : शहरातील गोविंद नाट्यमंदिरच्या मागे असलेल्या विहिरीत मंगळवारी रात्री दोन गवे पडले. रात्रभर पाण्यात राहिल्याने यातील एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसºया गव्याला जीवदान देण्यात नागरिकांना यश आले. दरम्यान, दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवलेल्या गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. उशिराने घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या कर्मचाºयांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत सुमारे चार तासांनंतर गव्याची सुटका केली.गोविंद नाटत्या कठड्यावरूनच गवे विहिरात पडले असावेत. घटनास्थळापासून काही अंतरावर राहात असलेल्या लक्ष्मी जाधव या आपल्या गाईच्या वासराला चरविण्यासाठी बुधारी सकाळी त्याठिकाणी गेल्या असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही गोष्ट घरातील माणसांना सांगितल्यानंतर स्वप्नील कामते, विजय सावंत, भार्गव धारणकर, मुजीब बेग आदी युवकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच विहिरीतील एका गव्याचा मृत्यू झाला होता, तर दुसरा मृत्यूशी झुुंज देत होता. युवकांनी दोरखंडाच्या सहाय्याने गव्याच्या शिंगांमध्ये फास अडकवला व विहिरीचा कठडा पाण्याच्या पातळीबरोबर तोडला. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने या प्रयत्नांना यश आले आणि गवा सुखरूप पाण्याबाहेर आला. हा गवा नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने युवकांनी त्याच दोरखंडाच्या साहाय्याने त्याला नजीकच्या माडाला बांधून ठेवले. तरीही गवा सैरभैर उधळू लागला. मात्र, शिंगात दोरखंडाचा फास अडकला असल्याने त्याला पळता आले नाही. त्यामुळे भेदरलेल्या स्थितीत तेथेच अडकून पडला.दरम्यान, शहरात गवा पकडल्याची माहिती वाºयासारखी पसरली आणि काही मिनिटातच नागरिंकांनी घटनास्थळी गर्दी केली. तासाभरानंतर वनक्षेत्रपाल विजय कदम, वनपाल अमित कटक, प्रताप कोळे, बा. सी. ओटवणेकर, आमीर काकतीकर, संतोष मोरे, विशाल पाटील, चंद्रसेन धुरी आदी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पाहून भेदरलेला गवा दोरखंड तोडण्याचा प्रयत्न करीत होता. दोरखंड तुटल्यास गवा नागरिकांच्या दिशेने धाव घेऊ शकतो, हे लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाºयांनी नागरिकांना दूर जाण्याची विनंती केली. दुपारी दोन वाजले तरी बघ्यांंची गर्दी कमी होत नव्हती. अखेर वनविभागाने कडक भूमिका घेत नागरिकांना घटनास्थळापासून दूर केले. त्यानंतर दुसरा दोरखंड आणून विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाच्या मदतीने शिताफीने गव्याच्या पायात दोरी अडकवत शिंगांमध्ये अडकलेला दोरखंडाचा फास काढला. त्यानंतर चार तासानंतर सुटका झालेल्या गव्याने नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने धाव घेतली.दरम्यान, मृत झालेल्या गव्याला वनविभागाच्या कर्मचाºयांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीबाहेर काढले. रितसर पंचनामा केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या सर्व प्रकारात पोलीस प्रशासन मात्र दूर राहिल्याने वनविभागाच्या अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी नागरिकांनी केलेली गर्दी दूर करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाºयांना नाकीनऊ आले. यावेळी त्यांनी सावंतवाडी पोलिसांची मदत मागितली. मात्र, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारी आणि अन्य एक कर्मचारी वगळता कोणीच फिरकले नाहीत. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी नाराज होते.्यमंदिरच्या मागे असलेल्या विहिरीचा कठडा जमिनीपासून केवळ एक फूट उंच आहे.